शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही, जरा मुंबईकडून शिका... SC नं केंद्राला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.

नवी दिल्ली - ऑक्सिजन संकटाच्या मुद्द्यावर केंद्राच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे, की आदेशाचे पालन करणे, ही केंद्राची जबाबदारी आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्रवाई करा. (Supreme court on centre plea delhi hc contempt warning on oxygen supply in delhi)

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकटावर सल्ला दिला, की वैज्ञानिक पद्धतीने याच्या वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशात दिल्लीने काही शिकायला हवे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.

आम्ही बफर स्टॉक तयार करण्याचे संकेत दिले होते. अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत केले जाऊ शकते, तर निश्चितपणे दिल्लीतही केले जाऊ शकते. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा आणि कसा मिळेल, हे सोमवारपर्यंत सांगा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

राजधानीतील ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात कुचराईमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने बजावलेल्या अवमानना नोटिशी विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली.गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार