शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:43 IST

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने लोकही घरातच बंदिस्त झालेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता साऱ्याचा उद्योगधंद्यांना टाळे लागले आहे. यामुळे अनेकांचा रोजगारही बुडालेला आहे. तर या परिस्थितीचा फायदा घेणारेही बरेच आहेत. अन्न धान्याच्या व इतर वस्तूंच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवून लुटालूट सुरु झालेली आहे. यामुळे नोकरदार, व्यावसायिकांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. 

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. तसेच गृह कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्याही ग्राहकांना दिलासा देऊ शकणार आहेत. ही सूचना लागू करणे बँकांवर अवलंबून असणार आहे.

तुमचा ईएमआय चुकला तर ज्या बँकेतून ईएमआय वजा होतो ती बँक आणि ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे ती बँक दोघेही दंड आकारतात. तसेच सिबिल स्कोअरही झटकन खाली येतो. हप्ता एकदा जरी चुकला तरीही याचा मोठा फटका बसतो. मात्र, तीन महिने बँकांनी ईएमआय कापू नये, असं रिझर्व्ह बँकेनं सुचवलं आहे. त्यावर निर्णयाचा अधिकार बँकांना दिला आहे. मग याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न पडला असेलच ना. चला पाहुया काय काय होणार आहे. 

आरबीआयचा निर्णय ३१ मार्चपासून लागू होणार आहे. यामुळे या दिवसापासून ज्यांचे ईएमआय जातात त्यांना दिलासा मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीने होम लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल आणि त्याची तीन महिने ईएमआय देण्याची परिस्थिती नसेल तर त्याला कोणताही दंड आकारला जाणारा नाही. आरबीआयने याची व्यवस्था या निर्णयातून केलेली आहे. आरबीआयने तशी विनंती बँकांना केली आहे. 

सिबिल स्कोअरवर काय फरक पडेल?या तीन महिन्यांत एकही हप्ता न गेल्याने याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा हप्ता सुरु होणार आहे. 

बुडालेला हप्ता कधी द्यावा लागणार? तीन महिने हप्ता द्यावा लागणार नाही, याचा अर्थ असा नाही की ते पैसे माफ झाले. तर बँका तुमच्या लोनचे रिस्टक्चरिंग करणार आहेत. म्हणजेच जर तुमचे पाच वर्षांचे लोन असेल तर तुमच्या लोनचा कालावधी तीन महिन्यांनी वाढणार आहे. म्हणजेच पाच वर्षे तीन महिने असा कालवधी होणार आहे. तसेच जर तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ करून बुडालेला हप्ता फेडायचा असेल तर तोही पर्याय बँका देऊ शकतात. 

क्रेडिट कार्डधारकांसाठी काय? क्रेडिट कार्ड हे मुदत कर्ज नाही. ते ग्राहकांच्या खरेदीचे बिल आहे. आरबीआयच्या घोषणेत त्याचा समावेश नाहीय. जर एखाद्याने मोठी खरेदी केलेली असेल आणि ते बिल त्याने ईएमआयमध्ये रुपांतरीत केली असेल तर कदाचित नवी घोषणा लागू होऊ शकते. पण त्यासाठी आरबीआयला वेगळे स्पष्टीकरण द्यावे लागेल. 

ईएमआय स्थगितीचा तोटाही...तीन महिन्यांचा दिलासा मिळालेला आहे. ईएमआय माफ करण्यात आलेला नाही. यामुळे कर्जाचा अवधी वाढणार आहे. या थकलेल्या ईएमआयचे तीन महिन्यांचे अतिरिक्त व्याज द्यावे लागणार आहे. एकीकडे दिलासा असताना त्याचा भारही खिशातून उचलावा लागणार आहे. नवभारत टाईम्सने ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या