शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Coronavirus: ...म्हणून 'जनता कर्फ्यू'साठी 22 मार्चचा दिवसच सर्वोत्तम; ज्योतिषांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 19:10 IST

Coronavirus: ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांमधील राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तींचा कारक मानला जातो.

ठळक मुद्दे रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलंय.गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहु आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात.22 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ आहे.

जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्याचं मोठं आव्हान भारतापुढे उभं ठाकलंय. केंद्र सरकार आणि सगळीच राज्य सरकारं अत्यंत गंभीरपुढे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. देशातील कोरोना बाधितांची संख्या 298 पर्यंत पोहोचलीय आणि पुढचे सात-आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सगळेच जाणकार सांगताहेत. या पार्श्वभूमीवरच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना उद्याच्या रविवारी, म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलंय. त्यांनी 'जनता कर्फ्यू'साठी एकच दिवस का निवडला आणि हाच दिवस का निवडला, या प्रश्नांचं ठोस उत्तर मिळू शकत नाही. मात्र, हा दिवस 'जनता कर्फ्यू'साठी अत्यंत योग्य असल्याचा दावा ज्योतिष अभ्यासकांनी केला आहे. तसंच, थाळी नाद, घंटानाद, शंखनादही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांमधील राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तींचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहु आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. हे विषाणू हवा प्रदूषित करतात. राहुचा अंक 4 आहे आणि 22 या तारखेतील दोन संख्यांची बेरीज 4 होते. तसंच 22 मार्चला शततारका नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे, अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे.

22 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ आहे. या कालावधीत वातावरणातील विषाणू हटवण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो, याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधलंय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटणाऱ्या राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी रविवारी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, घंटा, थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 

ज्योतिषशास्त्र मानायचं की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणं, अधिक माणसांच्या संपर्कात न येणं हेच कोरोना  संसर्ग रोखण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावं लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, ही सर्व नेत्यांचं आणि यंत्रणांचं आवाहन प्रत्येकानं ऐकणं, आवश्यक पथ्यं पाळणं अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा वाढला! 

आज राज्यात कोरोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुण्याचे आहेत. यवतमाळ आणि कल्याणमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झालीय. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे.

कोरोना कसा पसरतो?; मोदींचा व्हिडीओ

जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तुमचं एक मिनिट कोरोनाचा प्रसार थांबवू शकतं, असं नमूद करत कोरोनाचा संसर्ग कसा होतो, हे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितलंय. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीAstrologyफलज्योतिष