शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:46 IST

Coronavirus in India: मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली.

नवी दिल्ली - संसर्गाच्या भयावह वेगामुळे संपूर्ण देशाला भीतीची भयाण छाया दाखवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून बऱ्यापैकी ओसरली आहे. (Coronavirus in India) देशातील दैनंदिन रुग्णवाढ आणि मृत्यूंच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीच्या प्रमाणामध्येही तब्बल ७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सीएनएन न्यूज १८ द्वारे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार मे महिन्यात भारतामध्ये कोरोना विषाणुमुळे १ लाख १७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. (CoronaVirus Positive News) तर नव्या रुग्णांची संख्या ही ८८.८२ टक्के एवढी राहिली होती. जूनमध्ये आतापर्यंत ६६ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१ लाख ८७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states)

मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली. अनेक राज्यांत मे महिन्यात हजारो रुग्णांची नोंद होत होती. तिथे आता ही संख्या शेकडो रुग्णांवर येऊन मर्यादित झाली आहे. काही राज्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या ४५ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आङे. ही संख्या ७ मे च्या तुलनेत ८९ टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना एके दिवशी देशात सर्वाधिक ४ लाख ४१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. जागतिक स्तरावरही हा आकडा सर्वाधिक आहे.

भारतामध्ये १ जून रोजी कोरोना विषाणूच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८.९५ लाख एवढी होती. ती आता ७२ टक्क्यांनी घटली आहे. देशामध्ये बुधवारी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार एवढी आहे. देशामध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० मे रोजी ३७ लाख ४५ हजार एवढी होती. त्याच्या तुलनेत आता सक्रिय रुग्णांचे प्रमाण  ८६ टक्क्यांनी घटले आहे.

देशामध्ये गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाख होती. १६ सप्टेंबर रोजी हा आकडा ५० लाखांवर पोहोचला. १९ डिसेंबर रोजी या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला. चार मे रोजी देशातील कोरोबाधितांची संख्या २ दोन कोटीच्या पुढे गेली. तर २३ जून रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत