शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:46 IST

Coronavirus in India: मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली.

नवी दिल्ली - संसर्गाच्या भयावह वेगामुळे संपूर्ण देशाला भीतीची भयाण छाया दाखवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून बऱ्यापैकी ओसरली आहे. (Coronavirus in India) देशातील दैनंदिन रुग्णवाढ आणि मृत्यूंच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीच्या प्रमाणामध्येही तब्बल ७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सीएनएन न्यूज १८ द्वारे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार मे महिन्यात भारतामध्ये कोरोना विषाणुमुळे १ लाख १७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. (CoronaVirus Positive News) तर नव्या रुग्णांची संख्या ही ८८.८२ टक्के एवढी राहिली होती. जूनमध्ये आतापर्यंत ६६ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१ लाख ८७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states)

मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली. अनेक राज्यांत मे महिन्यात हजारो रुग्णांची नोंद होत होती. तिथे आता ही संख्या शेकडो रुग्णांवर येऊन मर्यादित झाली आहे. काही राज्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या ४५ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आङे. ही संख्या ७ मे च्या तुलनेत ८९ टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना एके दिवशी देशात सर्वाधिक ४ लाख ४१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. जागतिक स्तरावरही हा आकडा सर्वाधिक आहे.

भारतामध्ये १ जून रोजी कोरोना विषाणूच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८.९५ लाख एवढी होती. ती आता ७२ टक्क्यांनी घटली आहे. देशामध्ये बुधवारी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार एवढी आहे. देशामध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० मे रोजी ३७ लाख ४५ हजार एवढी होती. त्याच्या तुलनेत आता सक्रिय रुग्णांचे प्रमाण  ८६ टक्क्यांनी घटले आहे.

देशामध्ये गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाख होती. १६ सप्टेंबर रोजी हा आकडा ५० लाखांवर पोहोचला. १९ डिसेंबर रोजी या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला. चार मे रोजी देशातील कोरोबाधितांची संख्या २ दोन कोटीच्या पुढे गेली. तर २३ जून रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत