शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:46 IST

Coronavirus in India: मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली.

नवी दिल्ली - संसर्गाच्या भयावह वेगामुळे संपूर्ण देशाला भीतीची भयाण छाया दाखवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून बऱ्यापैकी ओसरली आहे. (Coronavirus in India) देशातील दैनंदिन रुग्णवाढ आणि मृत्यूंच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीच्या प्रमाणामध्येही तब्बल ७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सीएनएन न्यूज १८ द्वारे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार मे महिन्यात भारतामध्ये कोरोना विषाणुमुळे १ लाख १७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. (CoronaVirus Positive News) तर नव्या रुग्णांची संख्या ही ८८.८२ टक्के एवढी राहिली होती. जूनमध्ये आतापर्यंत ६६ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१ लाख ८७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states)

मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली. अनेक राज्यांत मे महिन्यात हजारो रुग्णांची नोंद होत होती. तिथे आता ही संख्या शेकडो रुग्णांवर येऊन मर्यादित झाली आहे. काही राज्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या ४५ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आङे. ही संख्या ७ मे च्या तुलनेत ८९ टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना एके दिवशी देशात सर्वाधिक ४ लाख ४१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. जागतिक स्तरावरही हा आकडा सर्वाधिक आहे.

भारतामध्ये १ जून रोजी कोरोना विषाणूच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८.९५ लाख एवढी होती. ती आता ७२ टक्क्यांनी घटली आहे. देशामध्ये बुधवारी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार एवढी आहे. देशामध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० मे रोजी ३७ लाख ४५ हजार एवढी होती. त्याच्या तुलनेत आता सक्रिय रुग्णांचे प्रमाण  ८६ टक्क्यांनी घटले आहे.

देशामध्ये गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाख होती. १६ सप्टेंबर रोजी हा आकडा ५० लाखांवर पोहोचला. १९ डिसेंबर रोजी या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला. चार मे रोजी देशातील कोरोबाधितांची संख्या २ दोन कोटीच्या पुढे गेली. तर २३ जून रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत