शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:26 IST

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल यावर देश आणि जगातील डॉक्टर्स पूर्णपणे सहमत नाहीत. विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.इटलीचे डॉक्टर टोटा लुइगी यांचा तर्क आहे की, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारावर ही तिसरी लाट मुलांमध्ये सर्वात जास्त पसरेल आणि ती त्यांच्या जीविताला धोका ठरेल, असे म्हणता येत नाही. जगात मुलांसाठी कोणतीही लस नाही यामुळे असा समज निर्माण होतो.दिल्लीतील बालरोग विशेषज्ञ डॉक्टर हेमा बिष्ट म्हणतात की, “लाट दुसरी असो वा तिसरी मुलांना संक्रमणापासून दूर ठेवणे महत्त्वाचे. परंतु, तिसऱ्या लाटेचे संकेत असतील तर केवळ त्या आधारावर मुलांना बाधा होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ऑक्सफ़ोर्डचे डॉक्टर अमित गुप्ता मानतात की, “आज जे काही उपलब्ध आहे त्या आधारावर तुम्ही मुलांमध्ये संक्रमण होईल, असे म्हणता. परंतु, तसे म्हणणे घाईचे ठरेल. कारण या मुद्यावर अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही.” हा नवा म्युटेंट मुलांना संक्रमित करू शकतो. या म्युटेंटबाबत ही  गोष्ट पूर्ण शक्य आहे की, मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसणार नाहीत परंतु त्यांना त्याची बाधा होऊ शकते. डॉक्टर्स आणि विशेषज्ञही माहिती कमी उपलब्ध असल्यामुळे संभ्रमात आहेत. आम्हाला तयार राहावे लागेल-गुलेरियाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “सामान्यत: हे पाहण्यात आले आहे की, अशा प्रकारची महामारी तीन टप्प्यांत आपला प्रभाव निर्माण करते. तिचा दुसरा टप्पा सर्वांत जास्त धोकादायक समजला जातो. तिसरी लाट मुलांना संक्रमित करील याबद्दल जे बोलले जात आहे त्यात स्पष्टता नाही. कारण आतापर्यंत जगातून जी माहिती मिळाली त्या आधारावर कोणतीही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. कारण म्युटेंटचा स्वभाव पाहता मुलांबाबत आम्हाला तयार राहावे लागेल. कारण आज आमच्या हाताशी कोणतीही लस उपलब्ध नाही.”कोरोनामुक्त झाल्यावर एक वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम टोकियो : कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारीरिक स्थितीची चाचणी केली.    २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत