शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:26 IST

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल यावर देश आणि जगातील डॉक्टर्स पूर्णपणे सहमत नाहीत. विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.इटलीचे डॉक्टर टोटा लुइगी यांचा तर्क आहे की, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारावर ही तिसरी लाट मुलांमध्ये सर्वात जास्त पसरेल आणि ती त्यांच्या जीविताला धोका ठरेल, असे म्हणता येत नाही. जगात मुलांसाठी कोणतीही लस नाही यामुळे असा समज निर्माण होतो.दिल्लीतील बालरोग विशेषज्ञ डॉक्टर हेमा बिष्ट म्हणतात की, “लाट दुसरी असो वा तिसरी मुलांना संक्रमणापासून दूर ठेवणे महत्त्वाचे. परंतु, तिसऱ्या लाटेचे संकेत असतील तर केवळ त्या आधारावर मुलांना बाधा होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ऑक्सफ़ोर्डचे डॉक्टर अमित गुप्ता मानतात की, “आज जे काही उपलब्ध आहे त्या आधारावर तुम्ही मुलांमध्ये संक्रमण होईल, असे म्हणता. परंतु, तसे म्हणणे घाईचे ठरेल. कारण या मुद्यावर अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही.” हा नवा म्युटेंट मुलांना संक्रमित करू शकतो. या म्युटेंटबाबत ही  गोष्ट पूर्ण शक्य आहे की, मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसणार नाहीत परंतु त्यांना त्याची बाधा होऊ शकते. डॉक्टर्स आणि विशेषज्ञही माहिती कमी उपलब्ध असल्यामुळे संभ्रमात आहेत. आम्हाला तयार राहावे लागेल-गुलेरियाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “सामान्यत: हे पाहण्यात आले आहे की, अशा प्रकारची महामारी तीन टप्प्यांत आपला प्रभाव निर्माण करते. तिचा दुसरा टप्पा सर्वांत जास्त धोकादायक समजला जातो. तिसरी लाट मुलांना संक्रमित करील याबद्दल जे बोलले जात आहे त्यात स्पष्टता नाही. कारण आतापर्यंत जगातून जी माहिती मिळाली त्या आधारावर कोणतीही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. कारण म्युटेंटचा स्वभाव पाहता मुलांबाबत आम्हाला तयार राहावे लागेल. कारण आज आमच्या हाताशी कोणतीही लस उपलब्ध नाही.”कोरोनामुक्त झाल्यावर एक वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम टोकियो : कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारीरिक स्थितीची चाचणी केली.    २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत