शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Coronavirus: तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:26 IST

Coronavirus in India: विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असेल यावर देश आणि जगातील डॉक्टर्स पूर्णपणे सहमत नाहीत. विशेषज्ञांचे म्हणणे असे की, तिसरी लाट प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त संक्रमित होईल किंवा ती त्यांच्यासाठी जीवघेऊ ठरेल याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.इटलीचे डॉक्टर टोटा लुइगी यांचा तर्क आहे की, आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे तिच्या आधारावर ही तिसरी लाट मुलांमध्ये सर्वात जास्त पसरेल आणि ती त्यांच्या जीविताला धोका ठरेल, असे म्हणता येत नाही. जगात मुलांसाठी कोणतीही लस नाही यामुळे असा समज निर्माण होतो.दिल्लीतील बालरोग विशेषज्ञ डॉक्टर हेमा बिष्ट म्हणतात की, “लाट दुसरी असो वा तिसरी मुलांना संक्रमणापासून दूर ठेवणे महत्त्वाचे. परंतु, तिसऱ्या लाटेचे संकेत असतील तर केवळ त्या आधारावर मुलांना बाधा होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.” ऑक्सफ़ोर्डचे डॉक्टर अमित गुप्ता मानतात की, “आज जे काही उपलब्ध आहे त्या आधारावर तुम्ही मुलांमध्ये संक्रमण होईल, असे म्हणता. परंतु, तसे म्हणणे घाईचे ठरेल. कारण या मुद्यावर अजून काही विशेष माहिती उपलब्ध नाही.” हा नवा म्युटेंट मुलांना संक्रमित करू शकतो. या म्युटेंटबाबत ही  गोष्ट पूर्ण शक्य आहे की, मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसणार नाहीत परंतु त्यांना त्याची बाधा होऊ शकते. डॉक्टर्स आणि विशेषज्ञही माहिती कमी उपलब्ध असल्यामुळे संभ्रमात आहेत. आम्हाला तयार राहावे लागेल-गुलेरियाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, “सामान्यत: हे पाहण्यात आले आहे की, अशा प्रकारची महामारी तीन टप्प्यांत आपला प्रभाव निर्माण करते. तिचा दुसरा टप्पा सर्वांत जास्त धोकादायक समजला जातो. तिसरी लाट मुलांना संक्रमित करील याबद्दल जे बोलले जात आहे त्यात स्पष्टता नाही. कारण आतापर्यंत जगातून जी माहिती मिळाली त्या आधारावर कोणतीही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. कारण म्युटेंटचा स्वभाव पाहता मुलांबाबत आम्हाला तयार राहावे लागेल. कारण आज आमच्या हाताशी कोणतीही लस उपलब्ध नाही.”कोरोनामुक्त झाल्यावर एक वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम टोकियो : कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारीरिक स्थितीची चाचणी केली.    २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. जास्त लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत