शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Coronavirus: गुड न्यूज! देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात मागील १४ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 6:42 PM

१४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत.

ठळक मुद्देदेशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाहीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लोकांना दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहे. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

तसेच प्रत्येक अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. टाइमली रिस्पॉन्ससाठी कटिंग एज टेक्नोलॉजीचा वापर करणं गरजेचे आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लाईव्ह केस ट्रेकिंग, केस मॅनेजमेंट आणि कंटनेमेंट प्लान लागू करण्यासोबतच त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचंही काम केले असं लव अग्रवाल यांनी सांगितले.

या २५ जिल्ह्यात कर्नाटकातील ४, छत्तीसगड ३, केरळ २, बिहार ३, आणि हरियाणातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यात एकूण ८८८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यातील २८५ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. तर पाच राज्यात मिळून १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये १०० तासात एकही रुग्ण नाही. ७ रुग्ण बरे झाले

उत्तराखंडमध्येही चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, मागील १०० तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ७ रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही जिल्ह्यात अद्याप कर्फ्यू लावण्यात आला आहे.

या २५ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

गोंदिया-महाराष्ट्र

राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर - छत्तीसगड

देवानगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगु - कर्नाटक

वायनाड आणि कोट्टायम - केरळ

वेस्ट इंफाल - मणिपूर

दक्षिण गोवा-गोवा

राजौरी - जम्मू-काश्मीर

आयझॉल वेस्ट-मिझोरम

माहे-पुडुचेरी

एसबीएस नगर-पंजाब

पटना, नालंदा, मुगर-बिहार

प्रतापगड - राजस्थान

पानीपत, रोहतक, सिरसा-हरियाणा

पौरी गढवाल - उत्तराखंड

भद्रद्री कोत्तागुडम - तेलंगणा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या