शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

CoronaVirus News : बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याबाबत आज निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:38 AM

बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक ते पंधरा जुलैदरम्यान होणारी बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.न्या. ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाला माहिती देताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सरकार आणि सीबीएसईला विद्यार्थ्यांच्या चिंतेची जाणीव आहे. या मुद्यावर अधिकारी लवकरच निर्णय घेतील. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी एक दिवसासाठी तहकूब करण्याची विनंती करताना सांगितले की, अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळविला जाईल. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी २५ जूनपर्यंत स्थगित केली.काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, सीबीएसईला आधी घेतलेल्या परीक्षेच्या आधारे निकाल घोषित करण्यास आणि उर्वरित विषयांच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार गुणांच्या सरासरीच्या आधारावर गुण निश्चित करण्याचे निर्देश दिले जावेत. बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घोषित करणारी सीबीएसईची १८ मे रोजीची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारीही सर्वोच्च न्यायालयात अन्य एक याचिका दाखल करण्यात आली आहे.यात भारतीय शालेय प्रमाणपत्र परिषदेने (आयसीएसई) कोविड-१९ साथीदरम्यान घेतलेली परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आयसीएसईच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात सरकारच्या निर्णयाचे पालन केले जाईल. तथापि, कोर्टाने म्हटले की, आयसीएसई या मुद्यांवर स्वत: निर्णय घेऊ शकते.मेहता यांनी यावेळी सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आयसीएसईला बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी २५ जून रोजी ठेवली आहे.