शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Coronavirus News: चिंताजनक! कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सापडले; देशाचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 11:59 IST

Coronavirus News: दक्षिणेतील राज्यांनी देशाचं टेन्शन वाढवलं; केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. १ मे रोजी देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या ४ लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर काही दिवस कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मात्र आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. मात्र शेजारच्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.मोदींच्या वाराणसीत गंभीर परिस्थिती; आमचे खासदार गरजेच्या वेळी कुठे आहे?, जनतेचा सवालदेशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. गेल्या महिनाभरात दक्षिण भारतातील परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र आता ती हाताबाहेर जाऊ लागल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण भारतातील ४ राज्यांत कोरोनाचे १ लाख ३७ हजार ५७९ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी कर्नाटकाची अवस्था भीषण आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होतील; सुब्रमण्यम स्वामींच्या इशाऱ्याने उडाली खळबळबंगळुरूत कोरोनाचा विस्फोटबंगळुरूत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. बंगळुरूची अवस्था आता दिल्लीसारखी झाली आहे. गेल्या २४ तासांत बंगळुरूत कोरोनाच्या २३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद पहिल्यांदाच देशात झाली आहे. कर्नाटकात सध्या ४ लाख ८७ हजार २८८ जणांवर उपचार सुरू आहेत.केरळमध्ये लॉकडाऊनची घोषणाकेरळमध्ये गेल्या २४ तासांत ४१ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १७ लाख ४३ हजार ९३२ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यात ८ मे १६ मे दरम्यान कठोर लॉकडाऊन लागू केला आहे.आंध्र प्रदेश, तमिळनाडूतही कोरोनाचं थैमानआंध्र प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२ हजारहून अधिक रुग्ण सापडले. तर याच कालावधीत ८५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ५ दिवसांत राज्यात १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तमिळनाडूतही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २३ हजार ३१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत १६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या