शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus News : सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांच्या कोरोनास्थितीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:10 IST

Sonia Gandhi : पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार देशातील कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका यावेळी सोनिया गांधी यांनी केली. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदि उपस्थित होते. पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले. आपापल्या राज्यातील जनतेला अधिकाधिक लसी कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केले. तसेच राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचा सल्लाही सोनिया यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार देशात कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या प्रयत्नात कसूर करू नये, असा आदेशही सोनिया गांधी यांनी यावेळी दिला. 

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी      देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.     कोरोना साथीच्या काळात आम आदमीच्या हातात पैसे देण्याचे आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले की, या गर्विष्ठ सरकारला सूचनांचीही ॲलर्जी आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सरकारने लसीकरणाला गती द्यावी आणि स्थलांतरीत कामगारांच्या हातात पैसा द्यावा.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या