शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशातील रुग्णांचा आकडा ६७ लाखांवर; गेल्या २४ तासांत ७२,०४९ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 11:24 IST

Coronavirus Cases in India Latest Updates: देशातील रुग्णांचा आकडा ६७ लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२ हजार ४९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६७ लाखांवर गेला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (७ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२ हजार ४९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६७ लाख ५७ हजारांवर पोहोचली. आतापर्यंत १ लाख ४ हजार ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ८१ हजार ९४५ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५७ लाख ४४ हजार ६९४ लोक बरे झाले आहेत. देशात सध्या ९ लाख ७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

८ राज्यांतील ५५ जिल्ह्यांत ४८ टक्के रुग्णांचा मृत्यूकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत देशात ८ राज्यांतील २५ जिल्ह्यात ४८ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. २ कर्नाटक, २ पश्चिम बंगाल, २ गुजरात, १-१ जिल्हे पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मृत्यू दर १ % पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षणेविरहित रुग्ण; केवळ एक टक्का गंभीर अवस्थेतमहाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असली, तरी १४ लाख ४२ हजार ९६८ कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल २ लाख ३१ हजार ५२८ रुग्ण एकही लक्षण नसलेले आणि सौम्य लक्षण असलेले आहेत. ज्याचे प्रमाण १६ टक्के आहे.नराज्यात ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण म्हणजे एकूण ८० टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात फक्त एक टक्का म्हणजे ९,७५७ गंभीर रुग्ण आहेत. दरम्यान, १३,९९६ एवढे रुग्ण आयसीयू बाहेरील असून, ऑक्सिजनवर आहेत. त्यांचेही प्रमाण १ टक्का आहे, तर आतापर्यंत ३८,०८४ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला असून, राज्यातील मृत्युदर या आकडेवारीनुसार २ टक्के आहे. राज्यात २ लाख ५८ हजार १०८ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातही लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या, तसेच बरे होत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे. गंभीर रुग्णांची संख्या १३,९९६ असून, हे प्रमाण ५ टक्के आहे. आयसीयूबाहेर पण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण ४ टक्के आहे.

निवासस्थानीच विलगीकरणाचा सल्लामागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या किंवा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरविण्यासाठी सक्रिय असतात का, यावरही ठोस अभ्यास सुरू असून, हे रुग्ण काही प्रमाणात संसर्ग पसरवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत