शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

CoronaVirus News: सहा दिवसांत जगात सर्वाधिक मृत्यू भारतात; आरोग्य यंत्रणाही झाली अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 07:01 IST

अमेरिकेलाही टाकले मागे

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर वाढला असल्याने दररोज होणारे मृत्यूही वाढले आहेत. भारतात सात दिवसांमध्ये दररोज सरासरी एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण दगावले. अमेरिकेत भारतापेक्षा रुग्णसंख्या जास्त असली तरी तेथे आठवडाभरात दररोज मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या घटले आहे. पहिल्या चार देशांमध्ये भारत पहिल्या, तर रशिया चौथ्या स्थानी असून, दोन्ही देशांच्या दररोजच्या कोरोना मृत्यूसंख्येत सरासरी ८०० चे अंतर आहे. भारतात मृत्यूदर जगात कमी असला तरी आता दररोजच्या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणाही अस्वस्थ आहे.

१ ते ६ सप्टेंबरदरम्यान भारतात ६२५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याच काळात रुग्णसंख्याही रोज ९० हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेत सहा दिवसांमध्ये रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले. ब्राझीलमध्ये तर दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सहा दिवसांत सरासरी ६०० ने घटली, तर रशियात सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी १०० जण कोरोनामुळे दगावले. भारत त्यामुळे कोरोना लागण व मृत्यूचे नवे केंद्र बनला आहे. १ सप्टेंबरला भारतात १०२५ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना पॉझिटिव्हिटी दर ७.२ टक्क्यांवरून १२.६०% वर

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या तीन लाख चाचण्या कमी झाल्या तरी पॉझिटिव्हिटी दर ७.२ टक्क्यांवरून १२.६० टक्के झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या आकडेवारीनुसार ९०८०२ नवे कोरोना रुग्ण सापडले. आयसीएमआरनुसार गेल्या २४ तासांत ७२०३६२ जणांचे नमुने घेतले गेले.

गेल्या २४ तासांत ६९५६४ कोरोनाबाधित बरे झाले. देशात आता एकूण ३२,५०,४२९ कोरोना रुग्ण बरे झाले. देशात कोरोनाचे ८,८२५४२ सक्रिय रोग्यांवर उपचार सुरू आहेत. सोमवारपर्यंत देशात एकूण बाधितांची संख्या ४२०४६१३ झाली. कोरोनाने आतापर्यंत ७१६४२ जणांचा मृत्यू झाला. त्यात गेल्या २४ तासांत १०१६ जण मरण पावले. देशाचा रिकव्हरी दर ७७.३० टक्के व मृत्यूदर दर १.७० टक्के झाला.

वयोवृद्ध कोरोना रुग्णांसाठीच्या उपाययोजनांचा तपशील द्या : सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

कोरोना साथीच्या काळामध्ये वयोवृद्ध रुग्णांच्या उपचारांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती राज्यांनी नवीन प्रतिज्ञापत्रांद्वारे सादर करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. च्न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला. यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. कोरोनाची लागण झालेल्या वयोवृद्धांना अधिक उत्तम वैद्यकीय उपचार मिळायला हवेत, त्यांची अतिशय काळजी घेण्यात यावी याकरिता उपाययोजना करण्याचे न्यायालयाने सरकारला आदेश द्यावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.

याचिकादाराने म्हटले आहे की, कोरोना झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना राज्य सरकारांच्या विविध योजनांन्वये पेन्शनही मिळते. त्यामुळे या लोकांची ओळख पटविणेही सोपे आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी काय पावले उचलली याचे अहवाल राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहेत. मात्र तेवढे पुरेसे नाही.

राज्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यांची सखोल माहिती त्यांनी न्यायालयाला सादर करणे अपेक्षित आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या वयोवृद्धांना व्यवस्थित उपचार मिळालेले नाहीत याची काही उदाहरणे यात नमूद आहे. मास्क, औषधे, सॅनिटायझर तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा राज्यांनी करावा. त्यात हयगय करू नये असे ४ आॅगस्ट रोजी सुनावणीत बजावले होते.

सर्व तक्रारींचा निपटारा करा

कोरोना रुग्णांनी केलेल्या सर्व तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारांनी योग्य उपाययोजना करावी. त्या रुग्णाला भेडसावणारी समस्या मोठी आहे की छोटी याचा राज्य सरकारने विचार करू नये. वृद्धाश्रमांमध्ये नीट सॅनिटायझेशन केले जावे. तेथील वृद्धांचीही अतिशय काळजी घेण्यात यावी असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत