शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

CoronaVirus News : "जास्त वेळ मास्क लावू नका, तो आरोग्यासाठी त्रासदायक कारण..."; काँग्रेस आमदाराचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 20:21 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना काँग्रेस आमदाराने अजब दावा केला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 4,461 वर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा आवर्जून सल्ला दिला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना काँग्रेस आमदाराने अजब दावा केला आहे. 

मास्क वापरणं हे आरोग्यासाठी त्रासदायक असून मास्कचा जास्त वापर करू नये असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे. तसेच कोरोना चाचणीचाही काही उपयोग नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी मास्क लावला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना यावर प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कोरोनाबाबत अजब प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्याकडे मास्क आहे. पण आपण जास्त वेळ मास्क लावता कामा नये. मी एक आमदार म्हणून नाही, तर एमबीबीएस डॉक्टर म्हणून सांगतोय. जास्त वेळ मास्क लावू नका. गर्दीच्या ठिकाणी फक्त मास्क घाला" असं म्हटलं आहे. 

"चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल"

"तुम्ही श्वास घेत आहात, कार्बन डायऑक्साईड सोडताय, पुन्हा तोच नाकावाटे आत घेताय.. काय चाललंय हे?" असा प्रश्न देखील आमदारांनी उपस्थित केला आहे. यासोबतच त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचंही फार टेन्शन न घेण्याचा सल्ला आमदार इरफान अन्सारी यांनी दिला आहे. "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे फार घाबरून जायचं कारण नाही. मी वारंवार सांगतो आहे. आम्ही देखील बघतो आहोत. आमचे कुटुंबीय देखील आजारी होते. आज तुम्ही चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल. त्याची काय किंमत आहे?" असाही सवाल अन्सारी यांनी केला आहे.

"इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल, पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा"

"जर तुम्ही आरटीपीसीआर करताय, त्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला, तर ते इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल. पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा" असा अजब सल्ला अन्सारी यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. काही राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस