शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 12:20 IST

CoronaVirus Updates and News : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

हरिद्वार: हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा (कोविड -१९) विस्फोट होण्याची शक्यता आहे, कारण येथील एका मल्टीनॅशनल कंपनीतील २८८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कर्मचारी वेगवेगळ्या भागात राहत होते. तसेच, ते सामान्य लोकांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे. प्रशासन आता या मल्टीनॅशनल कंपनीतील कर्मचाऱ्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री तपासून पाहत आहे. याशिवाय. याच कंपनीतील इतर ४०० कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. 

मीडियाच्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहता कंपनीच्या आजू-बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. माध्यमांना माहिती देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कंपनीतील २88 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. इतर ४०० कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्यानंतर, त्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी १६४ लोकांची टीम कामाला लागली आहे."

डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशातील वाढत्या कोरोनाच्या या समस्येबद्दल इशारा दिला आहे. आयएमएने म्हटले आहे की, 'देशात हा समूह संसर्ग पसरला आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.' विशेष म्हणजे, कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक कोरोना प्रकरणांत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. 

देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अकरा लाखांचा टप्पा पार केला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (२० जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४०, ४२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे.

आणखी बातम्या...

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई, ५ टेम्पो जप्त    

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या