शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांसोबत नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'; पाहा काय मागितली मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:32 IST

लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे

ठळक मुद्देतुमचा कोरोनाशी लढा देण्याचा प्रवास ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधलाकोरोनाशी मुकाबला करणाऱ्या रुग्णांची मोदींनी बातचीत केली.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनमुळे देशातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितले.

मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा कोरोनाबाबत भाष्य केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे त्यामुळे तुम्ही मला माफ कराल ही खात्री वाटते. गोरगरिब जनतेला वाटत आहे हा कसला पंतप्रधान आहे. लोकांना अडचणीत टाकलं. घरात बंद करुन ठेवलं आहे. मात्र भारताच्या १३० कोटी जनतेला वाचवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कोरोनाशी मुकाबला केलेले रामगप्पा तेज यांच्याशी बातचीत केली. रामगप्पा यांनी मोदींना सांगितले की, क्वारंटाईनला लोकांनी जेल समजू नये. त्यावेळी मोदींनी त्यांना सांगितले की, तुमचा कोरोनाशी लढा देण्याचा प्रवास ऑडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल करा. तसेच मोदींनी कोरोनाग्रस्त कुटुंबाशीही संवाद साधला. कोरोनाशी कशाप्रकारे लढा दिला हे कुटुंबाने मोदींना सांगितले त्यावर तुम्ही आसपासच्या परिसरात कोरोनाबाबत लोकांना घरामध्येच राहण्यासाठी जनजागृती करा असं आवाहन केले. यावेळी एका डॉक्टरांनी मोदींना सांगितले की, आम्हाला उपचारासाठी सरकारकडून योग्य साहित्य मिळत आहे. मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युमुळे रुग्ण भयभीत होत आहेत. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की तुम्हाला इतका भयंकर रोग झाला नाही. कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे

पुण्यातील डॉक्टर बोरसे यांच्याशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. डॉक्टरांनी लोकांना सांगितले वारंवार हात धुवायला हवेत. खोकताना रुमालाचा वापर करावा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वत:ला इतरांपासून विलग ठेवा. आपला देश कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास डॉक्टरांनी मोदींकडे व्यक्त केला.

क्वारंटाईन केलेल्या लोकांनी सोशल डीस्टेंसिंग ठेवावं. अशा लोकांना भेदभावाची वागणूक देऊ नका. ते लोक जबाबदारीने स्वत:ला विलग ठेवत आहेत. यावेळी सोशल डिस्टेंसिंग वाढवा पण इमोशनल डिस्टेसिंग कमी करा

संकटावेळी माणुसकी जपा, गरिबांना जेवण द्या. भारत हे सर्व करु शकतो कारण ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.

टॅग्स :Man ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीdoctorडॉक्टर