शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

Coronavirus : कोरोनाचा कहर सुरू असतानाच या गावात पसरला रहस्यमय आजार, पाच जणांचा मृत्यू, ग्रामस्थ भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:18 IST

Coronavirus: गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

लखनौ - संपूर्ण देशात वाढत असलेला कोरोनाचा फैलाव आणि या विषाणूने ग्रामीण भागात केलेला शिरकाव यामुळे शासन आणि प्रशासन त्रस्त आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील शामली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सोंटा रसूलपूर गावामध्ये अज्ञान आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण तापाने फणफणत आहेत. गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून, गावात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असावा, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झालेल्या मृत्यूंचे कारणही कोरोना आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. (Mysterious disease spreads in the village In UP, 5 death)

मात्र हा आजार कोरोना आहे की अन्य काही याबाबत सध्यातरी स्पष्टता येऊ शकलेली नाही. कारण सरकारी आकडेवारीमध्ये सोंटा रसूलपूर गावात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र अनेक लोक रहस्यमय आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

या रहस्यमय आजाराने मृत्यू झालेल्यांची नावे नझीर, हासिद, आबिदा, तन्वीर आणि अफसाना यांचा समावेश आहे. मात्र हा आजार पसरत असताना या भागात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकला नाही. तसेच आरोग्य विभागाने शिबीर घेऊन तपासणी केली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामान्य मृत्यू असेल तर कोविडचे नियम पाळले जात नाहीत. मात्र दहशतीचे वातावरण असल्याने या मृतांच्या अंत्ययात्रेमध्ये फारसे नातेवाईक सहभागी होत नाही आहेत. तसेच ग्रामस्थही तुरळक प्रमाणातच अंत्ययात्रेला हजेरी लावत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणाची शामलीच्या डीएम जसजीत कौर यांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी सर्वै करण्यात येत आहे. पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच निरीक्षण समित्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ही मोहीम एकूण पाच दिवसांची होती. मात्र आता तिचा अवधी वाढवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील संसर्गाला अटकाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्य