शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Coronavirus : कोरोनाचा कहर सुरू असतानाच या गावात पसरला रहस्यमय आजार, पाच जणांचा मृत्यू, ग्रामस्थ भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:18 IST

Coronavirus: गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

लखनौ - संपूर्ण देशात वाढत असलेला कोरोनाचा फैलाव आणि या विषाणूने ग्रामीण भागात केलेला शिरकाव यामुळे शासन आणि प्रशासन त्रस्त आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील शामली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सोंटा रसूलपूर गावामध्ये अज्ञान आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण तापाने फणफणत आहेत. गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून, गावात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असावा, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झालेल्या मृत्यूंचे कारणही कोरोना आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. (Mysterious disease spreads in the village In UP, 5 death)

मात्र हा आजार कोरोना आहे की अन्य काही याबाबत सध्यातरी स्पष्टता येऊ शकलेली नाही. कारण सरकारी आकडेवारीमध्ये सोंटा रसूलपूर गावात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र अनेक लोक रहस्यमय आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

या रहस्यमय आजाराने मृत्यू झालेल्यांची नावे नझीर, हासिद, आबिदा, तन्वीर आणि अफसाना यांचा समावेश आहे. मात्र हा आजार पसरत असताना या भागात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकला नाही. तसेच आरोग्य विभागाने शिबीर घेऊन तपासणी केली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामान्य मृत्यू असेल तर कोविडचे नियम पाळले जात नाहीत. मात्र दहशतीचे वातावरण असल्याने या मृतांच्या अंत्ययात्रेमध्ये फारसे नातेवाईक सहभागी होत नाही आहेत. तसेच ग्रामस्थही तुरळक प्रमाणातच अंत्ययात्रेला हजेरी लावत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणाची शामलीच्या डीएम जसजीत कौर यांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी सर्वै करण्यात येत आहे. पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच निरीक्षण समित्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ही मोहीम एकूण पाच दिवसांची होती. मात्र आता तिचा अवधी वाढवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील संसर्गाला अटकाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्य