शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

CoronaVirus: कोरोनाच्या मुळावर हल्ला करण्यासाठी सरकार सज्ज; मेगा प्लान तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:49 AM

Coronavirus लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; सरकारची नवी रणनीती तयार

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचं संकट दिवसागणिक गंभीर होत चाललंय. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यातले जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे आता सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली असून आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून दर दिवशी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून सर्वात अचूक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे याच पद्धतीचा वापर चाचण्यांसाठी करण्यात येणार आहे. सध्या आयसीएमआरच्या अंतर्गत काम करणाऱ्या लॅब्स दर दिवशी १० हजार चाचण्या करतात. पुढल्या ३ दिवसांत यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. पुढील काही आठवडे ही क्षमता आणखी वाढवण्यावर काम केलं जाणार आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगाच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या २५० ट्रूनॅट आणि २०० सीबी-नॅट यंत्रांचांदेखील संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी वापर करण्यात येईल. 'ट्रूनॅट आणि सीबी-नॅटनं एका दिवशी १२ चाचण्या केला जाऊ शकतात. आमच्याकडे रोशेची २ कोबॅस-६८०० यंत्रं आहेत. याशिवाय आणखी दोन यंत्रांच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. या यंत्राच्या माध्यमातून दर दिवशी ५ हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात,' असंदेखील त्यांनी सांगितलं.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वेगानं वाढवण्यासाठी रणनीती तयार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आवश्यकता असलेल्या प्रकरणांच्या चाचण्या व्हाव्यात, यासाठी आरोग्य मंत्रालय आग्रही आहे. अनावश्यक चाचण्या करून यंत्रणेवरील ताण वाढवयाचा नाही, असं मंत्रालयानं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या