शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

Coronavirus: मास्क, सोशल डिस्टेंसिंग अन् लॉकडाऊन...; भारतात पुन्हा परतणार हे दिवस? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 07:56 IST

BF.7 व्हेरिएंट सर्वाधिक संक्रमिक पसरवणारा आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतोय.

नवी दिल्ली - चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा भयावह परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी हॉस्पिटल, स्मशानभूमीमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. यात भारतीयांना २०२०-२१ ची आठवण येत आहे. भारतातील लोक त्यादिवसाच्या कटू आठवणी पुन्हा नको याच मनस्थितीत आहेत. रस्त्यावर चालणारे मजूर, प्रत्येक गोष्टीला हात लावण्यापासून वाटणारी भीती, अफवा, हॉस्पिटलमधील जीवन मृत्यूचा संघर्ष हे अनुभव अंगावर काटे आणणारे आहेत. 

२०२०-२१ या काळातील भारतातील कोरोना स्थिती कदाचितच कुणी विसरू शकेल. मास्क जगण्याचा एक भाग बनला होता. सोशल डिस्टेंसिंगमुळे एकत्र येणे टाळत होते. लाखो कर्मचारी ऑफिस सोडून स्वत:च्या घरातून काम करत होते. महिनोमहिने लॉकडाऊन लागला होता. घरातून बाहेर निघणेही मुश्किल झालं होते. त्यामुळे पुन्हा असे दिवस कुणालाच नको. 

परंतु इच्छा नसली तरी चीन पुन्हा तेच दिवस पाहायला मिळत आहेत. चीनच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे. औषधांचा तुटवडा दिसून येतोय. अनेक शहरांमध्ये निर्बंध लागले आहेत. लोक उपचारासाठी बाहेर जात आहेत. चीनची ही अवस्था पाहून भारतदेखील सतर्क झाला आहे. पुन्हा ही स्थिती नको त्यासाठी मास्क घालणं गरजेचे झाले आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. विना टेस्टिंग आणि कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय बाहेर फिरायला नको. जर ही स्थिती भारतात आली तर देशात पुन्हा रस्त्यावर भयाण शांतता पाहायला मिळू शकते. त्याशिवाय वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनसारखं वातावरण बनू शकतं. पण सध्यातरी ही परिस्थिती येणार नाही अशी अपेक्षा आहे. 

चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 या व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळतोय. त्याठिकाणी सोशल डिस्टेंसिगचं पालन पुन्हा सुरू झालं आहे. BF.7 व्हेरिएंट सर्वाधिक संक्रमिक पसरवणारा आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतोय. त्यासाठी सोशल डिस्टेंसिंग पालन करणे गरजेचे झाले आहे. AIIMS चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, तणावाची स्थिती नाही परंतु सतर्क राहणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे. कोविड एप्रोपिएटचं पालन करायला हवं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, बाहेर जाताना मास्क लावून जा. जर तुम्ही लग्नाला, कार्यक्रमाला, सिनेमा हॉल, ऑडिटोरियमसारख्या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग पालन करणे आवश्यक आहे. वृद्ध, आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर सरकार सार्वजनिक कार्यक्रम, रॅली, मोर्च्यात सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध आणू शकतं. शहरांमध्ये गर्दी रोखण्यासाठी कलम १४४ लागू केला जाऊ शकतो. भारतात आतापर्यंत BF.7 चे ५ रुग्ण सापडलेत. ते रुग्ण यावर्षी जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आढळले आहेत. देशात लॉकडाऊनची स्थिती नाही. परंतु निर्बंध लावले जाऊ शकतात. कंन्टेंन्मेंट झोन बनवण्यावर जोर दिला जाऊ शकतो. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यावर पुन्हा वर्क फ्रॉम होम करायला लावलं जाऊ शकतं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत