शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

CoronaVirus News : आनंदाची बातमी; कोरोनाचा सामना करताना देशाला 'या' तीन पायऱ्यांवर मिळत आहे येश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:41 IST

वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढलाआतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढताना देशाच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे. या लढाईत भारताला, कोरोना बाधितांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि डेथ रेट, या तीन महत्वाच्या पायऱ्यांवर यश मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी या तिन्हींचेही वेगवेगळे आकडे समोर ठेवले. यावरून, कोरोना विरोधातील लढाईत भारताला मोठे यश मिळत आहे, हे स्पष्ट होते.

रुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढला -अग्रवाल म्हणाले, कोरोना बाधितांच्या डबलिंग रेटचा विचार करता, लॉकडाउनपूर्वी देशातील डबलिंग रेट 3.4 दिवस, असा होता. तो वाढून आता 11 दिवस झाला आहे. याहूनही चागली गोष्ट म्हणजे, काही राज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. 'दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 11 ते 20 दिवसांचा डबलिंग रेट आहे. कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 20 ते 40 दिवसांपर्यंत आहे. तर आसाम, तेलंगाणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात हाच रेट 40 दिवसांपेक्षाही अधिक आहे.'

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

78 टक्के मृतांमध्ये इतर आजारही -अग्रवाल म्हणाले, आतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 टक्के पुरुष तर 35% महिलांचा समावेश आहे. वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 60-75 वर्षांमधील 42 टक्के, तर 75हून अधिक वय असलेल्या 9.2 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे मरणारांपैकी 78 टक्के रुग्ण इतर कोणत्याना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. आतापर्यंत एकूण 1,074 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 33610 झाली असून यापैकी 24162 अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत. अशा प्रकारे, देशातील रिकव्हरी रेट वाढून 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 दिवसांपूर्वी रिकव्हरी रेट केवळ 13.06 टक्के होता. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की देशाला रिकव्हरीच्या बाबतीतही यश मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतdoctorडॉक्टरDeathमृत्यू