शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

CoronaVirus News : आनंदाची बातमी; कोरोनाचा सामना करताना देशाला 'या' तीन पायऱ्यांवर मिळत आहे येश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:41 IST

वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढलाआतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढताना देशाच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे. या लढाईत भारताला, कोरोना बाधितांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि डेथ रेट, या तीन महत्वाच्या पायऱ्यांवर यश मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी या तिन्हींचेही वेगवेगळे आकडे समोर ठेवले. यावरून, कोरोना विरोधातील लढाईत भारताला मोठे यश मिळत आहे, हे स्पष्ट होते.

रुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढला -अग्रवाल म्हणाले, कोरोना बाधितांच्या डबलिंग रेटचा विचार करता, लॉकडाउनपूर्वी देशातील डबलिंग रेट 3.4 दिवस, असा होता. तो वाढून आता 11 दिवस झाला आहे. याहूनही चागली गोष्ट म्हणजे, काही राज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. 'दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 11 ते 20 दिवसांचा डबलिंग रेट आहे. कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 20 ते 40 दिवसांपर्यंत आहे. तर आसाम, तेलंगाणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात हाच रेट 40 दिवसांपेक्षाही अधिक आहे.'

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

78 टक्के मृतांमध्ये इतर आजारही -अग्रवाल म्हणाले, आतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 टक्के पुरुष तर 35% महिलांचा समावेश आहे. वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 60-75 वर्षांमधील 42 टक्के, तर 75हून अधिक वय असलेल्या 9.2 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे मरणारांपैकी 78 टक्के रुग्ण इतर कोणत्याना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. आतापर्यंत एकूण 1,074 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 33610 झाली असून यापैकी 24162 अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत. अशा प्रकारे, देशातील रिकव्हरी रेट वाढून 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 दिवसांपूर्वी रिकव्हरी रेट केवळ 13.06 टक्के होता. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की देशाला रिकव्हरीच्या बाबतीतही यश मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतdoctorडॉक्टरDeathमृत्यू