शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

CoronaVirus: कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर;देशात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सर्वात वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:10 IST

मार्चच्या मध्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला.

हरिश गुप्तानवी दिल्ली :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा महाराष्ट्राला बसला असला तरी देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात वाईट परिस्थिती असून चाचण्यांचा वेग कमी असल्याचे उघड झाले आहे. रॅपिड अँटिजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर या चाचण्यांचा स्वतंत्र डेटा शेअर करण्याचे काम केंद्राने थांबवले आहे.

मार्चच्या मध्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. कोरोनाबाधितांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक होते. मात्र, अलीकडेच हे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटू लागले आहे. कोरोना चाचण्यांचा वाढवलेला वेग हे त्यामागील कारण आहे. १ एप्रिल रोजी राज्यात १ लाख ८० हजार लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या तर उत्तर प्रदेशात हेच प्रमाण १ लाख २० हजार एवढे होते. २७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात २ लाख ८० हजार चाचण्या घेण्यात आल्या तर उत्तर प्रदेशात केवळ १ लाख ८० हजार जणांच्या चाचण्याच पूर्ण होऊ शकल्या. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी २० लाख आहे तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २२ कोटी २० लाख एवढी आहे.

दिल्लीची कामगिरीही निराशाजनक

दिल्लीतही कोरोनाचा  कहर असताना चाचण्यांच्या बाबतीत दिल्लीचा वेग कमीच आहे. १ एप्रिल रोजी दिल्लीत ७८ हजार चाचण्या केल्या होत्या. मात्र, २७ एप्रिल रोजी हा आकडा ७३ हजारांपर्यंत घसरला. २७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ६३ लाख तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनुक्रमे ५२ लाख आणि २१ लाख चाचण्या करण्यात आल्या.

आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन या दोन चाचण्यांचा स्वतंत्र डेटा राज्यांशी शेअर करण्याचे काम इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) का थांबवले, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

      १ एप्रिल     ११ एप्रिल     २७ एप्रिल    २७ दिवसांत महाराष्ट्र     १,८०,०००     २,६०,०००     २,८०,०००     ६३,००,०००उत्तर प्रदेश     १,२०,०००     २,००,०००     १,८०,०००     ५२,००,०००दिल्ली     ७८,०००     १,१०,०००     ७३,०००     २१,००,०००देश     ११,१०,०००     ११,८०,०००     १७,२०,०००    ३,६७,००,०००

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या