शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

coronavirus: देशात नोंदवला गेला रुग्णांचा तीन महिन्यांतील नीचांक, मृत्यूदरही कमी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 05:49 IST

coronavirus News : देशभरात ३६,३७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या ७९.४६ लाखांवर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : देशभरात ३६,३७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या ७९.४६ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४८८ मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या १,१९,५०२ झाली आहे.  देशात १८ जुलै रोजी ३६ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये दैनंदिन सरासरी ९० हजारांवर असलेली रुग्णसंख्या आता सरासरी ५५ हजारांवर आली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही सरासरी ८० हजारांवरून ४५ हजारांवर आली आहे.  मृत्यूचे प्रमाण सप्टेंबरपासून १.५ टक्क्यावर कायम आहे. हे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी सणासुदीच्या काळात अधिक दक्षता बाळगणे गरजेची आहे.  

केरळात सर्वात कमी मृत्यूदर देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एक टक्क्यापेक्षा कमी मृत्यूदर आहे. केरळमध्ये मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे ०.३४ टक्के इतका आहे. दिवसभरात केरळमध्ये ४२८७, कर्नाटकात ४१३०, प. बंगालमध्ये ४१२१, महाराष्ट्रात ३६४५ आणि दिल्लीत २८३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात मृत्यू जास्तमहाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे ८५ जणांचे मृत्यू झाले. प. बंगालमध्ये ५९, दिल्लीत ५४, छत्तीसगढमध्ये ४३ आणि कर्नाटकात ४२ मृत्यूंची दिवसभरात नोंद झाली.  

रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर सध्या ६,२५,८५७ सक्रिय रुग्ण असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत  ७२ लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने लागण होणाऱ्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीपेक्षा अधिक आहे.  

कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 

जगातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. ज्या देशांनी स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले होते तिथे कोरोनाने पुन्हा दस्तक दिली आहे. भारतात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूदरात घसरण होत आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कॅडिलाच्याही दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढे जात आहेत. सीरम लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होत आहेत. याशिवाय ब्राझील, द. आफ्रिका आणि अमेरिकेत या लसीवरील चाचण्या सुरू आहेत. 

देशाचा रिकव्हरी रेट आता ९०.६२ झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. गत २४ तासांत पाचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महाराष्ट्र, प. बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनामुळे ५८ टक्के मृत्यू झाले आहेत. राजेश भूषण यांनी सांगितले की, सुरुवातीला १ ते १० लाख कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी ५७ दिवस लागले, तर आता १० लाख रुग्ण बरे होण्यासाठी केवळ १३ दिवस लागले. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत