शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

Lockdown : 'या' राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाउन, फक्त आवश्यक सेवाच राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 22:44 IST

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे.

ठळक मुद्देयापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

लखनौ - देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने आणि झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य सरकारेदेखील आपापल्या राज्यांत लॉकडाउन वाढवत आहेत. आता उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात केवळ रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांची दुकानेच खुली राहतील.

उत्तर प्रदेशात वाढत चालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्र मिळवण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी लॉकडाउनचा आदेश जारी केला आहे. या काळात सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील बाजार, मंड्या आणि कार्यालये बंद राहतील. मात्र, या काळात आवश्यक सेवा सुरूच राहतील. 

या काळात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी राहणार नाही. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर वाहनांची ये-जा सुरूच राहील. तसेच रेल्वे सेवादेखील पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. याकाळात 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व सवलती आणि नियमांमधील शिथीलता कायम ठेवण्यात आली आहे.

देशातील या 8 राज्यांत 90 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. यापैकी 90 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आहेत.

देशातील 86 टक्के मृत्यू केवळ 6 राज्यांत -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीओएमने माहिती दिली, की देशातील 86 टक्के कोरोनाबाधितांचे मृत्यू हे केवळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत झाले आहेत. तर 80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ