शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

LockdownNews: राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 8:23 PM

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट.राहुल गांधींनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी मजुरांना कर्ज देणारे पॅकेज नको, खिशात पैसा द्या, असा सल्लाही दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, या मजुरांच्या समस्या समजून घेतल्या. 

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

राहुल गांधी मोदी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळातही त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहे. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून तर ते प्रामुख्याने सरकार निशाणा साधत आहेत. 

आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा

मजुरांना कर्ज देणारं पॅकेज नको, खिशात पैसा द्या,तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला चढवत, लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारे पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवेत. लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका -शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका. ते रेटिंग नंतरही सुधारू शकेल. सध्या देशात मजूर आणि शेतकऱ्यांचा विषय काळजीचा आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीdelhiदिल्लीLabourकामगार