शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

CoronaVirus, LockdownNews : 12 मेपासून रेल्वे धावणार, पण नियम बदलले; 'अशा' आहेत नव्या अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 23:41 IST

मिळालेल्या  माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल. 

ठळक मुद्देकन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेशया रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईलकेवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. यामुळे बंद पडलेल्या प्रवासीरेल्वे गाड्या पुन्हा 12 मेपासून सुरू होत आहेत. मात्र यासंदर्भात, तिकट बुकिंग कशा प्रकारे होईल अथवा कोणकोणत्या मार्गांवरून रेल्वे धावेल, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. सुरूवातील काही मोजक्या रेल्वेच धावतील आणि याबरोबरच कोरोनाची तपासणीही केली जाईल. 

असे कराता येईल बुकिंग -रेल्वे मंत्रालयाने सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता, तिकीट बुकिंगसाठी अनेक नियम तयार केले आहेत. आता तुम्हाला रेल्वेस्थानकांवर जाऊन, रांगेत उभे राहून तिकीट मिळणार नाही. तर यासाठी आपल्याला https://www.irctc.co.in/nget/train-search वर जाऊनच तिकीट बुक करावे लागेल.

आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश -मिळालेल्या  माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल. 

तोंड झाकलेले असणे आवश्यक -ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट असेल, केवळ त्यांनाच स्थानकांत प्रवेश मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना आपल्या तोंडावर रुमाल अथवा मास्क लावणेही बंधनकारक आहे. स्थानकाहून निघण्यापूर्वी प्रवाशाचे स्क्रीनिंग होईल. तसेच केवळ आणि केवळ प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल.

आणखी वाचा - LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर

केवळ या अटींवरच सेवा -रेल्वे विभागाने रेल्वे गाड्या सुरू केल्या असल्या तरी, संपूर्ण नेटवर्क खुले केलेले नाही. यामुळे आपल्याला कुठूनही आणि कोठेही जाता येणार नाही. सध्या आपल्याला केवळ 15 शहरांसाठीच रेल्वे सेवा घेता येणार आहे. या शरहांत, दिब्रूगड, अगरतळ, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी, या ठिकाणांचाच समावेश आहे.

आणखी वाचा - LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेdelhiदिल्लीIndiaभारतpassengerप्रवासी