शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Coronavirus : देशात २१ राज्यांतील ७५ जिल्ह्यांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 07:03 IST

Coronavirus : १०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतात

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या राक्षसाशी संपूर्ण देशात लढण्यासाठी अखेर भारताची तयारी झाली आहे. एक दिवसाची जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) सोमवार सकाळपासूनच लॉक डाऊनमध्ये (राहत असलेला भाग सोडण्यास प्रतिबंध) रूपांतरित झाली. ही लॉक डाऊन उपाययोजना पहिल्या टप्प्यात दिल्लीसह २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७५ जिल्ह्यांत लागू झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन या उपाययोजनेत आणखी राज्ये समाविष्ट होऊ शकतील.जागतिक आरोग्य संघटनेने (हू) गेल्या आठवड्यात पाठवलेल्या एका गोपनीय अहवालानंतरनरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी पूर्ण लॉक डाऊनची गरज असल्याचा इशारा अहवालात देण्यात आलेला आहे. याबाबत एक आॅडियो क्लिप शनिवारी समोर आली. तिच्यात या शिफारशी केलेल्या आहेत. परंतु, प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने असा काही आशय नाकारला आहे.तथापि, रविवारी सायंकाळी दिल्लीत नवे निर्बंध लागू केले गेल्यानंतर अनेक भागांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शीघ्र कृती दल तैनात केले गेले.रेल्वेंत कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह अहवाल असलेले १२ प्रवासी आढळल्यानंतर सरकार सावध झाले. आता यातून लोकांकडून लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते म्हणून सरकारला काळजी वाटत आहे.या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत पॅसेंजर रेल्वेची सेवा ताबडतोब थांबवली गेली आहे आणि अनेक राज्यांनी आंतरराज्य बससेवा २४ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या २५ ठिकाणांसह ७५ जिल्ह्यांत हे निर्बंध असून ही यादी तीन दिवसांनंतर दुसरा आढावा घेतल्यानंतर वाढेल.१०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतातकोरोना विषाणूवरील मंत्र्यांच्या गटाने नागरी उड्डयन आणि पर्यटन मंत्रालयाला दिलेल्या सविस्तर अहवालात लक्ष वेधले की, गेला डिसेंबर, जानेवारी, फेब्रवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या काही दिवसांपर्यंत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक आणि विदेशी लोकांसह प्रवासी कोणतीही तपासणी न होता भारतात आले आहेत. या १०० दिवसांत जवळपास दोन कोटी लोक विदेशांतून भारतात आले आहेत.जवळपास एक लाख चिनी पर्यटक गेल्या चार महिन्यांत चीनमधून भारतात आले तर भारतात आलेल्या इटालियन पर्यटकांची संख्या सुमारे १.५ लाख आहे. एकट्या २०१९ मध्ये भारतात १.१० कोटी विदेशी पर्यटक आले व त्यांनी सध्या लॉक डाऊन असलेल्या जिल्ह्यांना भेट दिली. हे विदेशी पर्यटक पर्यटनस्थळांवर स्थानिक लोकांमध्ये मिसळले आणि ते पर्यटक अतिशय मोकळेपणे रेल्वे आणि बसेसनी फिरले.वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २४ व २५ फेब्रुवारी या भारत दौऱ्याच्या दिवसांपर्यंत कोरोना व्हायरसबद्दल धोक्याच्या घंटा क्वचितच वाजवल्या गेल्या. अपवाद फक्त खबरदारीचे उपाय योजना करण्याची केलेली आवाहने. परंतु, कोणतेही निर्बंध किंवा क्लॅम्प डाऊन नव्हते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या