शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! गेल्या 24 तासांत 40 टक्क्यांची वाढ, देशात 5,233 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:12 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज चार हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (8 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 5233 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,715 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. . 

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील दोन राज्यांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1,383 आणि महाराष्ट्रात 1036 रुग्ण सापडले आहेत. एकूण नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे फक्त या दोन राज्यातील आहेत. तसेच देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. 

कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात म्हणावी की नाही हे सांगणे घाईचे ठरेल. जोपर्यंत कोणताही नवीन व्हेरिएंट येत नाही, तोवर नवीन लाटेची शक्यता खूप कमी असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालून लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळ