शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! जिवंत कोरोना रुग्णाला घोषित केलं मृत; नातेवाईक मृतदेह घ्यायला आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:09 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून फोन देखील करण्यात आला. मात्र जेव्हा कुटुंबीयांनी मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण तो त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेहच नव्हता. यानंतर रुग्णालयात रुग्णाला शोधलं असता तो जिवंत असल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकरणानंतर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 65 वर्षीय महिलेला 18 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता रुग्णालयातून महिलेच्या नातेवाईकांना तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह घेऊन जा असं सांगण्यात आलं. नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मात्र पाहिल्यावर त्यांना हा दुसऱ्याच महिलेचा मृतदेह असल्याचं समजलं. त्यांनी तातडीने आपल्या रुग्णाचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

रुग्णालयात या घटनेने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी आपल्या रुग्णाचा शोध घेतला असता. त्यांना त्या जिवंत असल्याचं आढळून आलं. तसेच महिलेला सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतwest bengalपश्चिम बंगालDeathमृत्यू