शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! ...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 14:36 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींच्या वर गेली असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनामुळे काही राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच काही ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका देखील अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साताजन्माची गाठ अवघ्या 23 दिवसांत सुटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना काळात लग्न सोहळ्याचं आयोजन करणं थेट जीवावर बेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या 23 दिवसांनंतर नवरदेवाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील अजय शर्मा या 25 वर्षीय तरुणाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. मात्र लग्नानंतर चार-पाच दिवसानंतर अजयची तब्येत बिघडली आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नूचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने विवाह तेथेच पार पडला. या विवाहात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जीवघेणा ठरला विवाह सोहळा! लग्नाच्या 5 दिवसांनंतर नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू; गावात संसर्गाचा मोठा धोका

लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनामुळे लग्नाच्या पाच दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका 26 वर्षीय तरुणाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या लग्नाला अवघे पाच दिवस होत नाहीत तोवर त्याचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. अनेक लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे लग्नाला हजेरी लावलेल्या सर्वांचा शोध आता प्रशासनाच्या शोध घेऊन आणि त्यांची चाचणी करण्याचं काम अधिकाऱ्यांनी सुरू केलं आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू