शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

हृदयद्रावक! दोन तरुण मुलांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्या वडिलांनीही कोरोनामुळे सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:26 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,65,30,132 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 

एका पित्याने काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे आपला दोन्ही मुलाला गमावलं होतं. एका मुलाचे अंत्यसंस्कार होत नाहीत. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. नोएडाच्या जलालपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. यानंतर आता पित्याचा ही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोरोना उपचारादरम्यान अतार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अताप सिंह यांच्या कुटुंबात एकच मुलगा शिल्लक आहे. अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या डोळ्यांसमोर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. 

अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झाल्याचं समजलं. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अतार सिंह यांना मोठा धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र रात्री तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. गावात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे. 

पहिल्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच दुसऱ्या मुलाचंही निधन झाले आणि आता अतार सिंह यांच्या निधनाने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात आत्तापर्यंत अनेकांचा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 महिला आहेत. या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या सर्वांना आधी ताप आला आणि नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव

कोरोना काळात लग्न सोहळ्याचं आयोजन करणं थेट जीवावर बेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या 23 दिवसांनंतर नवरदेवाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील अजय शर्मा या 25 वर्षीय तरुणाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. मात्र लग्नानंतर चार-पाच दिवसानंतर अजयची तब्येत बिघडली आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश