शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयानक परिणाम! लोकांचे सरासरी वय 4 वर्षांनी झाले कमी; रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: चेन्नईमध्ये 25,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,483 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,622 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान चेन्नईमध्ये 25,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे. चेन्नईतील सरासरी आयुर्मान सुमारे 4 वर्षांनी कमी झाल्याचे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे. ते 70.7 वर्षांवरून 66.4 वर्षांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे  आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

लान्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, जून 2021 पर्यंत चेन्नईमध्ये कोरोनामुळे सुमारे 8000 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय लॉकडाऊन, वेळेवर उपचार न मिळणे आणि वैद्यकीय सेवेचा अभाव यामुळेही लोकांना जीव गमवावा लागला आहे. TOI नुसार, सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. टीएस सेल्वा विनयगम, जे या रिसर्चचा भाग होते, म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त वृद्ध लोक आहेत. तरीही, एक हजार लोकांमध्ये सरासरी 1.6 ते 2.1 अधिक मृत्यू नोंदवले गेले, तर चेन्नईमध्ये ते एक हजारामध्ये 5.2 होते. हा मृत्यू दर सामान्यपेक्षा जास्त आहे. या उच्च मृत्युदरामुळे, चेन्नईतील आयुर्मान कमी झाले. 2020 मध्ये ते 69.5 वर्षे कमी झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ते आणखी कमी केले.

तामिळनाडूमधील जन्म आणि मृत्यूचे निबंधक डॉ. सेल्वा विनयगम यांनी ही गेल्या 70 वर्षांतील सर्वात मोठी घसरण असल्याचं म्हटलं आहे. रजिस्ट्रारच्या आकडेवारीनुसार, चेन्नईमध्ये जानेवारी 2016 ते जून 2021 दरम्यान सुमारे 3.3 लाख लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 2.6 लाख मृत्यू हे 2019 पूर्वी जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाशी संबंधित आहेत. या 2.6 लाख मृत्यूंपैकी सुमारे 88 हजार लोकांचा कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झाला. सामान्य मृत्यूपेक्षा 25,990 अधिक असल्याचा अंदाज आहे. यात दुसऱ्या लाटेत 17,700 मृत्यूंचाही समावेश आहे.

TOI च्या अहवालानुसार, संपूर्ण साथीच्या काळात चेन्नईमध्ये 8617 मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यूंचा हिशोब वयोमानानुसार केला, तर जसजसे वय वाढत गेले तसतशी मृत्यूची सरासरीही वाढली. 30-39 वयोगटातील प्रति हजार मृत्यूंची सरासरी 0.4 होती, तर 40-49 वयोगटातील हा आकडा 2.26 होता. 60-69 वयोगटात हा आकडा 21.02 वर पोहोचला, तर 70-79 मध्ये त्याचा दर 39.74 वर पोहोचला. 80 आणि त्याहून अधिक वयोगटातील, हा आकडा 96.90 वर पोहोचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChennaiचेन्नई