शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोना चाचणीसाठी नमुने घेत असताना सिंह आणि बिबट्याचा मृत्यू, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्राणीसंग्रहालयातील तब्बल 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,82,970 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 441 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने देखील चिंता वाढवली आहे. असं असताना प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. जंगलच्या राज्यासोबत इतरही प्राणी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

तामिळनाडूच्या अरिगनार अण्णा या प्राणीसंग्रहालयात एक घटना घडली आहे. कोरोना तपासणीसाठी नमुने घेत असतानाच एका सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयसोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय बिबट्याचं नाव जया होतं आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आता मृत्यू झाला आहे. तर 5 वर्षीय सिंहाचं नाव विष्णू असं होतं आणि अन्ननलिकेत असलेल्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला आहे असं म्हटलं आहे. या जेव्हा पशुवैद्यकीय कोरोना नमुने घेत होते. तेव्हा या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. 

प्राणीसंग्रहालयातील 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं 

प्राणीसंग्रहालयातील तब्बल 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचारी आधीपासूनच क्वारंटाईन आहेत. आम्हाला अशी शंका होती, की प्राणीही कोरोनाबाधित होऊ शकतात. त्यामुळे, आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं. तसेच  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावं लागतं. गेल्या वर्षीही कविता नावाच्या सिंहिणीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तिला कॅन्सरही होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर

भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावायला हवा की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आता भाष्य केलं आहे. भारतात सध्या पूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावलं नुकसान पोहोचवू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. WHO प्रवास बंदीची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडू