शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Coronavirus: या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ दिशादर्शक; सुप्रीम कोर्टाकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 06:15 IST

वंचितांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

- योगेश बिडवई मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ सर्व देशाला मार्गदर्शक ठरत असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेषत: वंचित घटकांना अन्न व औषधांची टंचाई निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकारने १० मार्चला बालवाड्या आणि शाळा बंद केल्या. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने माध्यान्ह भोजन योजनेत देण्यात येणारे शिजविलेले अन्न महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. ३३ हजार ११५ अंगणवाड्यांतील सुमारे ८ लाख ३० हजार बालकांना अन्नपुरवठा केला जात आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. केरळने नवा आदर्श घालून दिला असल्याचे कौतुक सुप्रीम कोर्टाने केल्याचे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जननी योजना, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व तीन वर्षांपर्यंतची मुले यांच्यासाठीच्या जननी योजनेचा शिदा खंड न पाडता घरोघरी पोहोचविला जात आहे. लाभार्थ्यांना घरपोच योजनेचा लाभ मिळेल, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बालमृत्यू कमी करणे, बाळंतपणात माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठीच्या योजनांची कामेही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सुरू आहेत.

राज्य सरकारकडून २० रुपयांत पौष्टिक थाळी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून १ हजार कॅन्टीनमधून ही थाळी गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनाही आवश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.

केरळ सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. निवृत्तिवेतनधारकांना दोन महिन्यांचे निवृत्तिवेतन देण्यात येत आहे. निवृत्तिवेतनाचा लाभ न मिळणाऱ्यांना १,३२० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अंत्योदय व गरीब कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे, असे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी सांगितले.

केरळमध्ये कोरोनाचे नवे ३९ रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा १७६ वर

केरळमध्ये कोरोना विषाणूच संसर्ग झाल्याचे ३९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले. यातील ३४ रुग्ण कासारगोडमध्ये, दोन कन्नूरमध्ये आणि थ्रिसूर, कोझीकोड व कोल्लाममध्ये प्रत्येकी एक मिळून तीन जण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, ५,६०७ अतिदक्षता बेड तयार ठेवण्यात आले आहेत. गरज भासल्यास ७१६ हॉस्टेल्समध्ये १५,३३३ खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय