शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Coronavirus: या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ दिशादर्शक; सुप्रीम कोर्टाकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 06:15 IST

वंचितांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

- योगेश बिडवई मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ सर्व देशाला मार्गदर्शक ठरत असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेषत: वंचित घटकांना अन्न व औषधांची टंचाई निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केरळ सरकारने १० मार्चला बालवाड्या आणि शाळा बंद केल्या. त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने माध्यान्ह भोजन योजनेत देण्यात येणारे शिजविलेले अन्न महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. ३३ हजार ११५ अंगणवाड्यांतील सुमारे ८ लाख ३० हजार बालकांना अन्नपुरवठा केला जात आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. केरळने नवा आदर्श घालून दिला असल्याचे कौतुक सुप्रीम कोर्टाने केल्याचे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जननी योजना, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व तीन वर्षांपर्यंतची मुले यांच्यासाठीच्या जननी योजनेचा शिदा खंड न पाडता घरोघरी पोहोचविला जात आहे. लाभार्थ्यांना घरपोच योजनेचा लाभ मिळेल, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बालमृत्यू कमी करणे, बाळंतपणात माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे यासाठीच्या योजनांची कामेही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सुरू आहेत.

राज्य सरकारकडून २० रुपयांत पौष्टिक थाळी उपलब्ध करून दिली जाते. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून १ हजार कॅन्टीनमधून ही थाळी गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनाही आवश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.

केरळ सरकारने २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. निवृत्तिवेतनधारकांना दोन महिन्यांचे निवृत्तिवेतन देण्यात येत आहे. निवृत्तिवेतनाचा लाभ न मिळणाऱ्यांना १,३२० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अंत्योदय व गरीब कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे, असे केरळ राज्य योजना बोर्डाचे सदस्य डॉ. आर. राजकुमार यांनी सांगितले.

केरळमध्ये कोरोनाचे नवे ३९ रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा १७६ वर

केरळमध्ये कोरोना विषाणूच संसर्ग झाल्याचे ३९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले. यातील ३४ रुग्ण कासारगोडमध्ये, दोन कन्नूरमध्ये आणि थ्रिसूर, कोझीकोड व कोल्लाममध्ये प्रत्येकी एक मिळून तीन जण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, ५,६०७ अतिदक्षता बेड तयार ठेवण्यात आले आहेत. गरज भासल्यास ७१६ हॉस्टेल्समध्ये १५,३३३ खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय