शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

CoronaVirus : भारतातल्या छोट्या व्यावसायिकांचा चीनकडून सामान न मागवण्याचा निर्धार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 9:45 PM

चीनच्या संशयास्पद भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या छोट्या व्यावसायिकांनी चीनकडून सामान न मागवण्याचं ठरवलं आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्यासुद्धा नियंत्रणात आणणं अनेक देशांना कठीण जात आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू वुहान शहर असल्यानं चीनबद्दल अनेक देशांमध्ये नाराजी आहे. चीनकडूनहीभारतातल्या महत्त्वाच्या कंपन्यांची मालकी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला मोदी सरकारनंही वेळीच वेसण घातलेलं आहे. आता चीनच्या संशयास्पद भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या छोट्या व्यावसायिकांनी चीनकडून सामान न मागवण्याचं ठरवलं आहे. छोटे व्यावसायिक आता चीनकडून थेट मशीन आणि तंत्रज्ञान आयात करण्याच्या तयारीत आहेत.छोट्या व्यावसायिक आणि उद्योगपतींनी पुढील एक वर्षासाठी चीनकडून वस्तू मागवण्यास नकार दिला आहे. चीनच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणात सामान्य ग्राहक चिनी वस्तू नाकारू शकतात ही भीती त्या व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे चीनकडून होणारी आयात कमी होणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. चीनमधून माल किंवा वस्तू आणून त्या भारतात विक्री करणारे व्यापारी आता त्या वस्तूच देशात तयार करण्याचा धोका पत्करण्याचा विचारात आहेत.उद्योजक नितीन अग्रवाल सांगतात की, ते व्यवसायासाठी वर्षातून किमान तीन वेळा चीनला जायचे. पण कोरोनाच्या उद्रेकानंतर ते पुढील वर्षभर तरी चीनमध्ये जाणार नाहीत. तसेच माझ्यासारखे बरेच व्यापारी फोनवरून चिनी व्यावसायिकांना आता ऑर्डर देणार नाहीत, कारण जगभरात चिनी व्यावसायिकांनी विश्वास गमावलेला आहे. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यावसायिक दीपक अरोरा म्हणाले की, कोरोनाच्या वातावरणात माझ्यासकट शेकडो व्यापारी चीनवर असलेलं अवलंबित्व संपवण्यासाठी चीनकडून तयार वस्तू मिळण्याऐवजी मशीन व तंत्रज्ञान खरेदीची तयारी करीत आहेत.चीनविषयी कोरोनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा चीनला फटका बसणार असून, ते पाहता चिनी वस्तूंच्या विक्रीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. आता लोक भारतात तयार होणा-या अत्यंत महागड्या वस्तूही खरेदी करतील, पण चीनच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. पुढील वर्षापासून चीनकडून येणारी 50 टक्के आयात थांबविली गेली तर घरगुती उत्पादन कमीत कमी 30-35 अब्ज डॉलर्स कामाच्या स्वरूपात फायदा मिळू शकेल.2018मध्ये भारतानं चीनकडून 76.87अब्ज डॉलर्सची आयात केली होती, तर या काळात भारतानं चीनला फक्त 18.83 अब्ज डॉलर्सच्या सामानाची निर्यात केली. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात चीनकडून 68 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती, तर भारताची निर्यात फक्त 16.32अब्ज डॉलर्स एवढीच होती. चीन भारतीय आयटी आणि फार्मा कंपन्यांना त्यांच्या बाजारात उत्पादने विकू देत नाही. भारत कापूस, सूत, फॅब्रिक, धातू यांसारख्या हलक्या वस्तूंची चीनला निर्यात करतो. दुसरीकडे भारत चीनकडून दूरसंचार उपकरणे, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अणुभट्ट्या, बॉयलर, यंत्रसामग्री अशा वस्तू आयात करतो. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या