शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

CoronaVirus: "...तर आज देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख असता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:53 IST

देशातील रुग्ण दुपटीचा कालावधी १० दिवसांवर; लॉकडाउनमुळे संसर्ग न वाढल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : वेळेत लॉकडाउन केले नसते तर देशात आतापर्यंत १ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती. परंतु वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे तूर्त कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, अशी भावना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी सरासरी १० दिवसांवर आल्याने कोरोनाविरोधातील लढाईस मोठे बळ मिळाले आहे. देशात लागू केलेल्या लॉकडाउनला एक महिना पूर्ण होत असतानाच ही बाब पुढे आली आहे.रुग्ण दुप्पट होण्याचा चार दिवसांपूर्वी हा दर ७ दिवस होता. २१ मार्च रोजी ३ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. पुढच्या तीनच दिवसांत (२३ मार्च) दुप्पट होण्याचा वेग ५ दिवसांवर आला होता. जनता कर्फ्यू त्यादरम्यान झाला होता, असे निती आयोगाचे सदस्य डा. वी. के. पॉल यांनी आवर्जून नमूद केले. मधल्या काळात मात्र दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला होता. पॉल म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यावर नियंत्रण आले आहे. आज दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ९ दिवस आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे.८० जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीगेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण न आढळणाऱ्या जिल्ह्यांची सख्या ८० वर गेल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेगही १० वर आला असल्याने लॅकडाउन यशस्वी होताना दिसत आहे. तीन राज्यांमध्ये ४ आंतरमंत्रालय अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद व सूरतमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे.२४ तासांत १६८४ रुग्ण; एकूण बाधित २४,४४७गेल्या २४ तासांत (गुरुवार) १६८४ नवे रुग्ण देशभरात आढळले. रुग्णसंख्या २४ हजार ४४७ वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. आतापर्यंत ४७४८ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण २०.५७ टक्क्यांवर गेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या