शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 8:25 AM

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त १९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.

ठळक मुद्देसंपूर्ण जगभरात ६ लाख ६३ हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण तर ३० हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहेचीनला मागे टाकत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस हळूहळू भारतात झपाट्याने वाढत चालला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. देशासाठी २१ दिवस महत्त्वाचे आहेत. जर आपण हलगर्जीपणाने वागलो तर मोठा अनर्थ घडेल असा गर्भीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त १९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९८७ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा २४ झाला आहे. आतापर्यंत जगातील देशाचं पाहिलं तर जोपर्यंत यावर नियंत्रण आणत नाहीत तोपर्यंत कोरोना वाऱ्याच्या वेगाने लोकांना शिकार बनवतो. दिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत जातात. भारताची आकडेवारी पाहिली तर संशयितांची तपासणी योग्यरित्या होत नसल्याचं दिसून येत आहे. जितक्या प्रमाणात चाचणी केली जाईल हे आकडे आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

असाच आरोप अमेरिकेवरही केला जात आहे. संशयितांची तपासणी कमी प्रमाणात होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसते. जेव्हा तपासणी योग्यरितीने होईल हा आकडा वाढेल. ९ दिवसांपूर्वी अमेरिकेत १८,२०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता अमेरिकेत १ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण आहेत, २ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत ९२ हजार ४७२ रुग्ण आहेत. यातील १० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ७३ हजार २३५ रुग्ण आहेत. तर ५ हजार ९८२ मृत्यू झालेत. स्पेनपाठोपाठ जर्मनी ५७ हजार ६९५ कोरोनाबाधित आढळलेत. तर ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरात ६ लाख ६३ हजार ७४० लोक कोरोनाच्या विळख्यात अडकलेत तर ३० हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी २१ मार्चनंतर जलदगतीने सुरु झाली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. अनेक राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची साखळी तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन