शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Coronavirus: विद्यार्थी व पालकहो, CBSE दहावी, बारावीच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षेबाबत महत्त्वाची सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:33 PM

२० टक्के वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोपा असू शकतो. यासंदर्भात परीक्षा मंडळाने शाळांनाही माहिती दिली आहे

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. महाराष्ट्रातही दहावीच्या विद्यार्थ्यांचा राहिलेला शेवटचा पेपर रद्द करण्यात आला. मात्र सीबीएसई बोर्डाने परीक्षेबाबत कोणतीही सूचना न दिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत होतं.

सोमवारी सीबीएसईने एक परिपत्रक काढत म्हटलं की, २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला आहे. सीबीएसईच्या ९ ते १२ वी च्या पेपरमध्ये २० टक्के ऑब्जेक्टिव प्रकारचे प्रश्न असतील. ज्यात मल्टिपल चॉईस प्रश्नांचा समावेश असेल. अशाप्रकारे २० टक्के आणि १० टक्के सॉर्स बेस्ड इंटीग्रेटेड प्रश्न विचारले जातील. सीबीएसईची ही नवीन पद्धत 9 वी ते 12 वी पर्यंतच्या परीक्षेसाठी लागू केली गेली आहे असं म्हटलं आहे.

२० टक्के वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोपा असू शकतो. यासंदर्भात परीक्षा मंडळाने शाळांनाही माहिती दिली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पॅटर्न बदलला आहे, परंतु परीक्षेचे गुण आणि ती पूर्ण करण्याची वेळ तेवढीच राहील असं सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या स्थगित परीक्षावर हा नियम लागू असणार नाही. देशात लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा परीक्षा होईल त्यावेळी जुन्या पॅटर्नच्या आधारावर प्रश्न विचारले जातील असं परिपत्रकात म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या अनेक परीक्षा राहिल्या आहेत. १० वी आणि १२ वी साठी पहिलं ४१ विषयांसाठी परीक्षा घेतली जात होती. मात्र त्या कमी करुन फक्त २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षेबाबत आणि वेळापत्रक विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल. तथापि, यात अन्य काही बदल असल्यास सीबीएसईने विद्यार्थी, पालकांना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती पुरविण्यात येईल असंही सांगितले आहे

टॅग्स :examपरीक्षाCBSE Examसीबीएसई परीक्षा