शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

coronavirus: देशात कोरोनाचा कहर, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, मृतांनी ओलांडला सहा हजारांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 10:46 IST

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे ९ हजार ३०४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर २४ तासांमध्ये तब्बल २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - एकीकडे सव्वा दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच दुसरीकडे देशातील विविध कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी देशभरात मिळून कोरोनाचे ९ हजार ३०४ सापडले आहेत. देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर 260 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहा हजारांवर पोहोचली आहे. 

जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आतापर्यंत देशभरातील १८० देशांत कोरोनाचा फैलाव झाला असून, साडे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 63 हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच दररोज हा आकडा वेगाने वाढत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे ९ हजार ३०४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर २४ तासांमध्ये तब्बल २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ६ हजार ७५ वर पोहोचला आहे.

 मात्र रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

लॉकडाऊनच्या सुरुवातीला देशातील काही राज्ये कोरोनामुक्त होती. तसेच काही राज्यात रुग्णांची संख्या मर्यादित होती. मात्र स्थलांतरित मजुरांचे आगमन आणि प्रवासाला दिलेल्या परवानगीनंतर काही राज्यांमधील कोरोनाचे गणित बिघडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र