शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:34 IST

Coronavirus in India: देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत. 

लखनौ - देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत.  (Coronavirus in India) अशीच एक दु:खद घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील एका कुटुंबावर कुटुंबातील पाच सदस्यांचं तेरावं एकाच दिवशी घालण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. कुठल्याही कुटुंबावर अशी वेळ क्वचितच आली असेल, त्यातही ज्या पाच जणांचं तेरावं करण्यात आलं त्यामध्ये चार जण सख्खे भाऊ होते. (Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in 20 days in Uttar Pradesh)

लखनौमधील ओमकार यादव यांच्या कुटुंबाला या दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले. लखनौजवळ असलेल्या इमलिया पूर्वा गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या लाटेत यादव यांचे संपूर्ण कुटुंब उदध्वस्त झाले. हसत्या खेळत्या कुटुंबातील चार महिला विधवा झाला. कुटुंबातील एकूण आठ जणांच्या अवघ्या २० दिवसांच्या काळात मृत्यू झाला. त्यापैकी ७ जणांचा कोरोनाने तर एका ज्येष्ठ व्यक्तीचा भीतीने हृदयगती बंद पडून मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार २५ एप्रिलपासून १५ मेपर्यंतच्या काळात एकाच कुटुंबातील ८ जणांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. याबाबत गावाचे सरपंच मेवाराम यांनी सांगितसे की, एवढी भयावह घटना घडल्यानंतरही सरकारकडून कुठल्याही सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच कोरोनाची चाचणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.   कोरोनाचा संसर्ग होऊन कुटुंबातील आठ सदस्यांना गमावल्यानंतर आता या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सरकारकडून अद्यापपर्यंत सॅनिटायझेशन आणि कुटुंबीयांच्या चाचण्यांची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. गावच्या सरपंचांनी केलेल्या दाव्यानुसार येथे सुमारे ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासन अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू