शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:55 IST

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला जगातील अनेक देश मदत करत आहेत. मात्र, केनियातून खाद्य सामग्री येताच लोकांनी मोदी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.  लोक म्हणत आहेत, की विश्व गुरू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना ही मदद, कशा प्रकारचे चित्र दर्शवत आहे. सरकारने यावर विचार करायला हवा.

केनियाने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला एक छोटी मदत म्हणून 12 टन खाद्य सामग्री पाठवली आहे. या पूर्वेकडील आफ्रिकन देशाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीला 12 टन चहा, कॉफी आणि भूईमुगाच्या शेंगा दिल्या आहेत. तेथील लोकांनीच या सर्व गोष्टींचे उत्पादन केले होते. या खाद्य सामग्रीची पाकीट महाराष्ट्रात वाटली जातील, असे सरकारने म्हटले आहे. 

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे. ब्रेट म्हटले, हे खाद्य पदार्थ, जे लोक लोकांचा जीव वाचविण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत, अशा पुढच्या ओळीत काम करणार्‍या लोकांना देण्यासाठी आहे.  

केनियाच्या या मदतीवरून लोक सोशल मिडियावर सरकारविरोधात भडास काढत आहेत. सूरज सामंत नावाच्या एका हॅन्डलवरून लिहिण्यात आले आहे, की केनियाकडून एवढी मदत पाठवण्यात आली. मात्र, आपले सरकार सेंट्रल व्हिस्टाच्या कामात व्यस्त आहे. जे लोक असा विचार करतात, की त्यांनी मदत पाठवली असेल, तर आपण काय करू शकतो... तर त्यांना माझे उत्तर आहे, आपण अशा प्रकारेची मदत नाकारू शकतो. त्यांचे म्हणणे आहे, की 70 वर्षांत असे पहिल्यांदाच बघायला मिळाले.

आणखी एका युझरने लिहिले आहे, राहुल गांधी इटलीला गेले होते. तेथून त्यांनी सकारची छबी खराब व्हावी म्हणून, केनियाच्या नावाने मदत पाठवली. 

आणखी एका युझरने लिहिले आहे, जर नेपाळ मदीसाठी बोलू शकतो, तर केनियाने मदत पाठवली. एका यूझरने म्हटले आहे, की यामुळे जागतीक पातळीवर कशा प्रकारची प्रतिमा बनेल यावर सरकारने विचार करायला हवा. आता केनिया, नेपाळ सारख्या देशांच्या मदतीवर निर्भर होत आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkenyaकेनियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी