शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

coronavirus: कोरोनाविरोधातील लढाईत या तीन आघाड्यांवरून देशासाठी आली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:37 IST

CoronaVirus Positive News : एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याला लागणारा कालावधी वाढलाकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी घटलीकोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली - जवळपास महिनाभर लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाची चिंता वाढली असून, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर या आघाड्यांवर देशाला मोठे यश मिळत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आग्रवाल यांनी केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याला लागणारा कालावधी वाढला

लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणाला कालावधी वाढला आहे. लॉकडाऊनपूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागल होते. मात्र आता हा कालावधी आता ११ दिवस झाला आहे. त्यातही काही राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओदिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ११ ते २० दिवस आहे. तर कर्नाटक, लडाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ येथे रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी २० ते ४० दिवस एवढा आहे. तर आसाम, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ४० दिवसांहून अधिक झाला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी घटली

देशात आतापर्यंत १ हजार ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी ही ३.२ टक्के एवढी आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिला आहेत. भारतात कोरोनामुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांमध्ये ४५ वर्षांखाली व्यक्तींचे प्रमाणा १४ टक्के तर ४५ ते ६० या वयोगटातील ३४.८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६० वर्षांवरील ५१.२ टक्के कोरोनाबाधितांचा मृ्त्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

कोरोनाविरोधातील लढाईमधील अजून एक समाधानकारक बाब म्हणजे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील कोरोनाबाधित रु्ग्णांची बरे होण्याची टक्केवारी २५.१९ पर्यंत पोहोचली आहे. दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर १३.०६ टक्के एवढाच होता. या आकडेवारीवरून देशाला या तीन आघाड्यांवर यश मिळाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत