शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाविरोधातील लढाईत या तीन आघाड्यांवरून देशासाठी आली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 18:37 IST

CoronaVirus Positive News : एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याला लागणारा कालावधी वाढलाकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी घटलीकोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली - जवळपास महिनाभर लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाची चिंता वाढली असून, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर या आघाड्यांवर देशाला मोठे यश मिळत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आग्रवाल यांनी केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याला लागणारा कालावधी वाढला

लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणाला कालावधी वाढला आहे. लॉकडाऊनपूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागल होते. मात्र आता हा कालावधी आता ११ दिवस झाला आहे. त्यातही काही राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओदिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ११ ते २० दिवस आहे. तर कर्नाटक, लडाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ येथे रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी २० ते ४० दिवस एवढा आहे. तर आसाम, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ४० दिवसांहून अधिक झाला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी घटली

देशात आतापर्यंत १ हजार ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी ही ३.२ टक्के एवढी आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिला आहेत. भारतात कोरोनामुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांमध्ये ४५ वर्षांखाली व्यक्तींचे प्रमाणा १४ टक्के तर ४५ ते ६० या वयोगटातील ३४.८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६० वर्षांवरील ५१.२ टक्के कोरोनाबाधितांचा मृ्त्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

कोरोनाविरोधातील लढाईमधील अजून एक समाधानकारक बाब म्हणजे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील कोरोनाबाधित रु्ग्णांची बरे होण्याची टक्केवारी २५.१९ पर्यंत पोहोचली आहे. दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर १३.०६ टक्के एवढाच होता. या आकडेवारीवरून देशाला या तीन आघाड्यांवर यश मिळाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत