शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Coronavirus: मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 09:20 IST

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खझारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटनाआईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु

रांची – जगभरात कोट्यवधी लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातच झारखंडमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे एकाच कुटुंबातील एका पाठोपाठ ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खं व्यक्त करण्यात येत आहे. मयत महिला आणि मुलांशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. देशात कदाचित ही पहिली दुर्दैवी घटना असेल ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटना आहे. राणी बाजारात राहणाऱ्या एका कुटुंबातील ६ सदस्यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माहितीनुसार ४ जुलै रोजी ८८ वर्षीय आईचं बोकारो येथील नर्सिंग होममध्ये निधन झालं. मृतदेहाच्या तपासणीनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. यानंतर महिलेच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात झाला. काही दिवसानंतर दुसऱ्या मुलाला केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथे त्याचाही मृत्यू झाला.

मृत्यूचं तांडव इथेच थांबले नाही तर तिसरा मुलगा धनबादच्या एका खासगी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला. त्याठिकाणी त्याची तब्येत बिघडली आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. १६ जुलै रोजी चौथा मुलगा टीएमएच जमशेदपूरमध्ये कॅन्सच्या आजारामुळे मृत्यू झाला. पाचवा मुलगा धनबाद कोविड रुग्णालयातून रिम्स रुग्णालयात हलवलं. ज्याठिकाणी सोमवारी या मुलानाही अखेरचा श्वास घेतला. कोरोना संक्रमित वृद्ध आईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु आहेत. या कुटुंबाचं दु:ख कोणी ऐकलं तरी त्याच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये ही महिला दिल्लीत एका लग्न समारंभात हजर राहून कतरास येथील तिच्या राहत्या घरी आली, त्यानंतर तिची तब्येत बिघडली, तेव्हा महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्थानिक लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच घरात लग्नाचं वातावरण होतं, हसतं खेळतं कुटुंब आनंदात मग्न होतं. पण काळाने घात केला अन् एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंड