शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Coronavirus: मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 09:20 IST

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खझारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटनाआईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु

रांची – जगभरात कोट्यवधी लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातच झारखंडमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे एकाच कुटुंबातील एका पाठोपाठ ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खं व्यक्त करण्यात येत आहे. मयत महिला आणि मुलांशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. देशात कदाचित ही पहिली दुर्दैवी घटना असेल ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटना आहे. राणी बाजारात राहणाऱ्या एका कुटुंबातील ६ सदस्यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माहितीनुसार ४ जुलै रोजी ८८ वर्षीय आईचं बोकारो येथील नर्सिंग होममध्ये निधन झालं. मृतदेहाच्या तपासणीनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. यानंतर महिलेच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात झाला. काही दिवसानंतर दुसऱ्या मुलाला केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथे त्याचाही मृत्यू झाला.

मृत्यूचं तांडव इथेच थांबले नाही तर तिसरा मुलगा धनबादच्या एका खासगी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला. त्याठिकाणी त्याची तब्येत बिघडली आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. १६ जुलै रोजी चौथा मुलगा टीएमएच जमशेदपूरमध्ये कॅन्सच्या आजारामुळे मृत्यू झाला. पाचवा मुलगा धनबाद कोविड रुग्णालयातून रिम्स रुग्णालयात हलवलं. ज्याठिकाणी सोमवारी या मुलानाही अखेरचा श्वास घेतला. कोरोना संक्रमित वृद्ध आईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु आहेत. या कुटुंबाचं दु:ख कोणी ऐकलं तरी त्याच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये ही महिला दिल्लीत एका लग्न समारंभात हजर राहून कतरास येथील तिच्या राहत्या घरी आली, त्यानंतर तिची तब्येत बिघडली, तेव्हा महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्थानिक लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच घरात लग्नाचं वातावरण होतं, हसतं खेळतं कुटुंब आनंदात मग्न होतं. पण काळाने घात केला अन् एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंड