शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Coronavirus: मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 09:20 IST

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खझारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटनाआईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु

रांची – जगभरात कोट्यवधी लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातच झारखंडमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे एकाच कुटुंबातील एका पाठोपाठ ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खं व्यक्त करण्यात येत आहे. मयत महिला आणि मुलांशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. देशात कदाचित ही पहिली दुर्दैवी घटना असेल ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटना आहे. राणी बाजारात राहणाऱ्या एका कुटुंबातील ६ सदस्यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माहितीनुसार ४ जुलै रोजी ८८ वर्षीय आईचं बोकारो येथील नर्सिंग होममध्ये निधन झालं. मृतदेहाच्या तपासणीनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. यानंतर महिलेच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात झाला. काही दिवसानंतर दुसऱ्या मुलाला केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथे त्याचाही मृत्यू झाला.

मृत्यूचं तांडव इथेच थांबले नाही तर तिसरा मुलगा धनबादच्या एका खासगी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला. त्याठिकाणी त्याची तब्येत बिघडली आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. १६ जुलै रोजी चौथा मुलगा टीएमएच जमशेदपूरमध्ये कॅन्सच्या आजारामुळे मृत्यू झाला. पाचवा मुलगा धनबाद कोविड रुग्णालयातून रिम्स रुग्णालयात हलवलं. ज्याठिकाणी सोमवारी या मुलानाही अखेरचा श्वास घेतला. कोरोना संक्रमित वृद्ध आईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु आहेत. या कुटुंबाचं दु:ख कोणी ऐकलं तरी त्याच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये ही महिला दिल्लीत एका लग्न समारंभात हजर राहून कतरास येथील तिच्या राहत्या घरी आली, त्यानंतर तिची तब्येत बिघडली, तेव्हा महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्थानिक लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच घरात लग्नाचं वातावरण होतं, हसतं खेळतं कुटुंब आनंदात मग्न होतं. पण काळाने घात केला अन् एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंड