शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिलासादायक! "तिसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नाही जाणवणार, ऑक्टोबरपर्यंत ही राज्ये कोरोनामुक्त होणार’’, तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 08:48 IST

Coronavirus News: कोरोनाच्या लाटामागून लाटा येत असल्याने सर्वसामान्य भीतीच्या छायेखाली वावरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कानपूर - गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या फैलावाने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या लाटामागून लाटा येत असल्याने सर्वसामान्य भीतीच्या छायेखाली वावरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. (Coronavirus ) आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अगदीच नगण्य असल्याचा दावा केला आहे. ("The effects of the third wave of coronavirus will not be felt much, these states will be corona-free by October," experts claim)

मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने तिसऱ्या लाटेचा फैलाव अधिक होणार नाही, असे त्यांनी सांगितले. गणितीय मॉडेलच्या आधारावर त्यांनी हा दावा केला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग आता कमी होईल. तसेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि मध्य प्रदेशसारखी राज्ये कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

प्राध्यापक अग्रवाल यांना आपल्या संशोधनात दावा केला आहे की, ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही सुमारे १५ हजारांच्या आसपास राहील. त्याचे कारण तामिळनाडू, तेलंगाणा, केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तरेतील राज्यांमध्ये संसर्ग असेल. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता फार कमी आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अगदी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या साथीदरम्यान, सातत्याने आपल्या अभ्यासामधून सरकारला अलर्ट केले आहे. त्यांनी दुसऱ्या लाटेबाबत केलेला दावा बऱ्यापैकी अचूक ठरला होता. प्रा. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन आणि लसीकरणाचा खूप लाभ झाला आहे. दुसऱ्या लाटेनंतर लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. तसेच वेगाने सुरू असलेल्या लसीकरणामुळेही कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात मदत मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य