शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus: 'लॉकडाऊन'मध्ये मित्राच्या घरी जाऊ शकतो का?; युवकाच्या प्रश्नावर पोलिसांचं हटके उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 09:33 IST

सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे.

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहेलोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारने केले आहेट्विटरवर युवकाने विचारलेल्या प्रश्नावर दिल्ली पोलिसांनी दिलं तात्काळ उत्तर

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखायचा असेल तर हे २१ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद केल्या आहेत. लोकांच्या आरोग्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे असं मोदींनी सांगितले.

देशातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रस्त्यावर पोलीस अशी परिस्थिती संपूर्ण देशभरात झाली आहे. विनाकारण घराबाहेर पडत असाल तर पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. एका युवकाने दिल्ली पोलिसांना ट्विटरवरुन प्रश्न विचारला त्याला दिल्ली पोलिसांनीही तात्काळ उत्तर दिलं. या युवकाने विचारलं की, लॉकडाऊनच्या परिस्थितीत मी माझ्या मित्राला भेटायला जाऊ शकतो का? यावर दिल्ली पोलिसांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हालाही हसायला येईल.

दीपक प्याल असं या युवकाचे नाव आहे. दिल्ली पोलिसांना टॅग करुन त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, सर, २ किलोमीटर अंतरावर त्याच्या मित्राचं घर आहे, कामानिमित्त त्याच्या घरी जाऊ शकतो का? त्यावर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं जर खरा मित्र असशील तर घरातच राहा, व्हिडीओ कॉल कर अशी प्रतिक्रिया दिली. लोकांनाही दिल्ली पोलिसांनी दिलेलं उत्तर मजेशीर वाटलं.

अनेकांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.

 

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ६५७ इतकी झाली आहे तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संक्रमित होणारी ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे १३० कोटींच्या देशात पुढील २१ दिवस कोणालाही विनाकारण घराच्या बाहेर पडता येणार नाही. काही अपवाद वगळता लोकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावं अन्यथा कायदा मोडल्याप्रकरणी तुम्हाला २ वर्षापर्यंत जेलची शिक्षाही होऊ शकते असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदी