शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'लॉकडाऊन'मध्ये मित्राच्या घरी जाऊ शकतो का?; युवकाच्या प्रश्नावर पोलिसांचं हटके उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 09:33 IST

सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे.

ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहेलोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारने केले आहेट्विटरवर युवकाने विचारलेल्या प्रश्नावर दिल्ली पोलिसांनी दिलं तात्काळ उत्तर

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखायचा असेल तर हे २१ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद केल्या आहेत. लोकांच्या आरोग्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे असं मोदींनी सांगितले.

देशातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रस्त्यावर पोलीस अशी परिस्थिती संपूर्ण देशभरात झाली आहे. विनाकारण घराबाहेर पडत असाल तर पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागत आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी एका युवकाला दिलेल्या हटके उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. एका युवकाने दिल्ली पोलिसांना ट्विटरवरुन प्रश्न विचारला त्याला दिल्ली पोलिसांनीही तात्काळ उत्तर दिलं. या युवकाने विचारलं की, लॉकडाऊनच्या परिस्थितीत मी माझ्या मित्राला भेटायला जाऊ शकतो का? यावर दिल्ली पोलिसांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हालाही हसायला येईल.

दीपक प्याल असं या युवकाचे नाव आहे. दिल्ली पोलिसांना टॅग करुन त्याने पोस्टमध्ये लिहिलं की, सर, २ किलोमीटर अंतरावर त्याच्या मित्राचं घर आहे, कामानिमित्त त्याच्या घरी जाऊ शकतो का? त्यावर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं जर खरा मित्र असशील तर घरातच राहा, व्हिडीओ कॉल कर अशी प्रतिक्रिया दिली. लोकांनाही दिल्ली पोलिसांनी दिलेलं उत्तर मजेशीर वाटलं.

अनेकांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.

 

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ६५७ इतकी झाली आहे तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संक्रमित होणारी ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे १३० कोटींच्या देशात पुढील २१ दिवस कोणालाही विनाकारण घराच्या बाहेर पडता येणार नाही. काही अपवाद वगळता लोकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावं अन्यथा कायदा मोडल्याप्रकरणी तुम्हाला २ वर्षापर्यंत जेलची शिक्षाही होऊ शकते असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदी