शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

coronavirus: कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत, या राज्याने केंद्राकडे केली पाच हजार कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 18:18 IST

एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे  गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांश प्रमाणात बंद होतेमहसूलाचा ओघ आटल्याने अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे राज्यांना नियमित खर्च भागवणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे  गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांश प्रमाणात बंद होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच महसूलाचा ओघ आटल्याने अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे राज्यांना नियमित खर्च भागवणे कठीण झाले आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पाच हजार कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आणि कार्यालयीन खर्चाचा भार उचलण्यासाठी दरमहा ३ हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत जीएसटीच्या माध्यमातून केवळ ५००-५०० कोटी रुपयेच आले आहेत. तसेच अन्य माध्यमातून आलेल्या कमाईचा विचार केल्यास एकूण १७५० कोटी रुपयांचीच भर तिजोरीत पडली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिल्ली सरकारच्या करसंकलनामध्ये ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देऊ शकतो. सर्व खर्च भागवण्यासाठी आम्हाला सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे आम्ही वित्तमंत्र्यांना पत्र लिहून ही मदत रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्या रकमेमधून आम्ही आपल्या डॉक्टरांना आणि अन्य कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकू.

 सिसोदिया यांनी सांगितले की, कुठुनही महसूल मिळत नाही आहे. केंद्राने जो मदतनिधी जाहीर केला होता त्यातूनही दिल्लीला काहीच मिळाले नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल