शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 10:07 IST

लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून

छपरा : लॉकडाऊनमुळे गरीबांचे हाल बेहाल झाले आहेत. अशातच बिहारमध्ये एका बँकेमध्ये वृद्धेची क्रूर थट्टा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनधन खात्यातील पैसे काढण्यास गेलेल्या एका वृद्धेला तुम्ही मयत आहात, तुमच्या खात्यातून पैसे करे देऊ? असे धक्कादायक उत्तर मिळाल्याने तिच्यावर वेगळेच संकट कोसळले आहे. आता या महिलेला ती जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. 

ही घटना मागील आठवड्यातील आहे. लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून त्या सकाळी सकाळीच बँकेत गेल्या होत्या. चाने देवी पैसे काढण्यासाठी काऊंटरवर गेली तेव्हा तिला तिचे खाते बंद झाल्याचे समजले. तिने कारण विचारले असता उत्तर ऐकून धक्काच बसला. तुमचा मृत्यू झाला आहे, यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आल्याचे चानो देवीला सांगण्यात आले. 

हे ऐकल्यानंतर चानो देवीला धक्का बसला. तिला समजच नव्हते की हे कसे झाले. एकीकडे लॉकडाऊन, वरून पैशांची चणचण आणि आता समोर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची धडपड अशी संकटे येऊन ठेपली होती. अखेर तिने बँकेमध्येच याचे कारण विचारले. तेव्हा तिला आणखी मोठा धक्का बसला. तिच्या गावची सरपंच पूनम देवी हिनेच चानो देवी मृत झाल्याचे प्रमाण पत्र बँकेला दिले होते. सरपंच महिलेने चानो यांचा ९ ऑक्टोबर २०१९ मध्येच मृत्यू झाल्याचे लेचर हेडवर लिहून बँकेला दिले होते. धक्कादायक म्हणजे या पत्रावर सरपंचाच्या मुलाची सही आहे. एरव्ही सही जुळत नाही म्हणून खातेधारकांना, चेक वटविण्यासाठी रडकुंडीला आणणाऱ्या बँकेला सरपंचाची सही कशी ओळखता आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून खात्यातील पैसेच तिच्याकडे शेवटचे आहेत. आता तिची मदत कोण करणार असा प्रश्न चानो देवीने उपस्थित केला आहे. तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई सुरु असल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :bankबँकDeathमृत्यू