शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: देशात कोरोनाचा फैलाव धोकादायक पातळीवर, चिंता व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:02 IST

coronavirus In India : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या देशातील फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. (coronavirus In India) महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लादली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकराची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच  पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील विविध आरोग्य सेवांचा दौरा करून कोरोनावरील पुढील रणनीती बाबत डॉक्टरांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. (Coronavirus spread in India at dangerous level, the health minister Dr. Harshvardhan expressing concern & made a big statement) हर्षवर्धन यांनी आज एम्सचा दौरा केला. यावेळी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि रुग्णालयातील अन्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशभरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही विविध रुग्णालयांचा दौरा करत आहोत. तसेच पुढील तयारीसाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमसोबत चर्चाही करत आहोत. तुम्हाला माहिती असेलच की गेल्यावर्षी कोरोनाविरोधात लढाईला सुरुवात झाली होती तेव्हा प्रत्येक बाबतीत उणिवा दिसून येत होत्या. मात्र आम्ही अनुभवामधून खूप काही शिकलो आहोत. तसेच आमचा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला आहे. 

२०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र २०२१ मध्ये आमच्या डॉक्टरांकडे कोरोनाविरोधात लढण्याचा अनुभव अनेक पटींनी अधिक आहे. देशात केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. देशतील कुठल्याही रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सची टंचाई होऊ दिली जाणार नाही. आतापर्यंत कुठल्याही राज्याने आमच्याकडे व्हेंटिलेटर्स ची मागणी केलेली नाही. बहुतांश राज्यांनी केंद्राकडून पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचासुद्धा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागा नाही, अशी माहितीही हर्शवर्धन यांनी दिली.  दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनोचे २ लाख १७ हजार ३५३ रुग्ण सापडले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर दिवसभरात ११८५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत तब्बल १ लाख १८ जार ३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य