शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:41 IST

coronavirus In Punjab : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रापाठोपाठ अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदिगड - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना विषाणूचा फैवाव मोठ्या वेगाने होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रापाठोपाठ अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सरकार अलर्ट झाले असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus threat increased, strict restrictions imposed by the Punjab Government )

वाढत्या कोरोनामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोरोनाला रोखण्यासाठी या निर्णयांची घोणषा केली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे प्रभावित असलेल्या ११ जिल्ह्यांत सर्व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सोबतच सर्व शिक्षण संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामधून वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांना सूट देण्यात आली आहे. हे निर्बंध २१ मार्चपासून सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत लागू राहतील. या दरम्यान, विवाह आणि लग्न समारंभांना परवानगी असेल. मात्र त्यामध्ये केवळ २० लोकांना सहभागी होता येणार आहे.  

पंजाबमधील लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, अमृतसर, होशियारपूर, कपूरथला, शहीद भगतसिंगनगर, फत्तेहगड साहिब, रोपड आणि मोगा या जिल्ह्यात हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्याबरोरच या जिल्ह्यांमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. राज्यामध्ये चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉलमध्ये एकावेळी १०० हून अधिक जणांना गोळा होण्यास परवानगी नसेल. घरगुती कार्यक्रमांनाही १० हून अधिक लोकांच्या एकत्र होण्यावर बंदी आणण्यात आली आहे.  

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कडक उपाययोजना आखण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 17 मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबIndiaभारत