शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus: कोरोनास्थिती अतिवाईटाकडे, संपूर्ण देशालाच जोखीम, महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:52 IST

coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशापुढील कोरनास्थितीचे संकट विशद केले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आढळून येत आहे, असे पॉल यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असून, तेथील परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याचे पॉल म्हणाले. रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही पॉल यांनी नमूद केले.केंद्राने केलेल्या सूचना...अनेक राज्यांमध्ये बाधितांचे विलगीकरण घरीच होत आहे. परंतु त्यावर नीट लक्ष ठेवले जात नाही तसे होत नसेल तर बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा ७२ तासांत शोध घेतला जावा आरटी-पीसीआर चाचण्यांवर अधिकाधिक भर दिला जाणे गरजेचे दाट वस्त्यांमध्ये रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक व्हाव्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आला नाहीमहाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे ३,३७,९२८ सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरी एका दिवसात तीन हजार नवे रुग्ण येत आहेत. आतापर्यंत एका दिवसात ३४ हजार रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका दिवशी ३२ मृत्यू हाेत आहेत. ते वाढून ११८ झाले आहेत.राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिवदेशाची सद्य:स्थिती  गेल्या २४ तासांत आढळलेले बाधित५६,२११मृत्युमुखी पडलेले बाधित : २७१ आजपर्यंतचे बाधित१,२०,९५,८५५बरे झालेले बाधित१,१३,९३,०२१उपचाराधीन रुग्ण५,४०,७२०एकूण कोरोनाबळी१,६२,११४ कोरोनाचा विषाणू अजूनही खूप सक्रिय आहे. हा विषाणू आपले सुरक्षाकवच भेदू शकतो. कोरोना नियंत्रणात आला आहे, असे आपण समजत असतानाच तो पुन्हा हल्ला करू शकतो. त्यामुळे संपूर्ण देशानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.     व्ही.के. पॉल, निती आयोगाचे सदस्य  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा  वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. ही अट ३० जूनपर्यंत लागू राहील.कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. रुग्णसंख्येत दैनंदिन होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून, वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस