शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

coronavirus: कोरोनास्थिती अतिवाईटाकडे, संपूर्ण देशालाच जोखीम, महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:52 IST

coronavirus: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाइटाकडून अतिवाइटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशापुढील कोरनास्थितीचे संकट विशद केले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आढळून येत आहे, असे पॉल यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असून, तेथील परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याचे पॉल म्हणाले. रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही पॉल यांनी नमूद केले.केंद्राने केलेल्या सूचना...अनेक राज्यांमध्ये बाधितांचे विलगीकरण घरीच होत आहे. परंतु त्यावर नीट लक्ष ठेवले जात नाही तसे होत नसेल तर बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा ७२ तासांत शोध घेतला जावा आरटी-पीसीआर चाचण्यांवर अधिकाधिक भर दिला जाणे गरजेचे दाट वस्त्यांमध्ये रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक व्हाव्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आला नाहीमहाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे ३,३७,९२८ सक्रिय रुग्ण आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरी एका दिवसात तीन हजार नवे रुग्ण येत आहेत. आतापर्यंत एका दिवसात ३४ हजार रुग्ण येत आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका दिवशी ३२ मृत्यू हाेत आहेत. ते वाढून ११८ झाले आहेत.राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिवदेशाची सद्य:स्थिती  गेल्या २४ तासांत आढळलेले बाधित५६,२११मृत्युमुखी पडलेले बाधित : २७१ आजपर्यंतचे बाधित१,२०,९५,८५५बरे झालेले बाधित१,१३,९३,०२१उपचाराधीन रुग्ण५,४०,७२०एकूण कोरोनाबळी१,६२,११४ कोरोनाचा विषाणू अजूनही खूप सक्रिय आहे. हा विषाणू आपले सुरक्षाकवच भेदू शकतो. कोरोना नियंत्रणात आला आहे, असे आपण समजत असतानाच तो पुन्हा हल्ला करू शकतो. त्यामुळे संपूर्ण देशानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे.     व्ही.के. पॉल, निती आयोगाचे सदस्य  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  ऑक्सिजनचा ८० टक्के पुरवठा  वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. ही अट ३० जूनपर्यंत लागू राहील.कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. रुग्णसंख्येत दैनंदिन होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून, वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस