शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे परिस्थिती बिघडली, भारतात समूह संसर्गास सुरुवात झाली, आयएमएने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 09:22 IST

गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेकोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत

नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला आहे. दररोज देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती आयएमएने दिली आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही बाब खूप चिंताजनक आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती खूप वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत असून, देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.

एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशात समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचा दावा सातत्याने करत असतानाच डॉ. मोंगा यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या समूह संसर्ग झाल्या नसल्याच्या  दाव्याला अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, प्रचंड वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे भारत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरम्यान, डॉ. मोंगा म्हणाले की, कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे.  

 अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाचे दहा लाख ३८ हजार ७१६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ५३ हजार ७५१ जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMedicalवैद्यकीयHealthआरोग्य