शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

By बाळकृष्ण परब | Updated: February 21, 2021 08:26 IST

Corona patients are rise in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, गुजरातमध्येही वाढू लागलीय रुग्णसंख्या शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद, केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंदकोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. (Covid-19) त्यामुळे विविध राज्यांसह केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (fearing a Covid-19 second wave) त्यातही महाराष्ट्रासह, केरळ, गुजरात आणि अन्य काही राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Corona patients are rise in Maharashtra, Kerala & Gujarat)समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तर गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे २५८ नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या चार हजार ६५० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या १० लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९ लाख ६७ हजार ६३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५८ हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गुजरातमध्येही कोरोनाच्या २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून २ लाख ६६ हजार ८२१ झाली आहे. गुजरातमध्ये शनिवारी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ४०४ वर स्थिर आहे. तर राज्यात सध्या १ हजार १६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातKeralaकेरळHealthआरोग्य