शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

By बाळकृष्ण परब | Updated: February 21, 2021 08:26 IST

Corona patients are rise in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, गुजरातमध्येही वाढू लागलीय रुग्णसंख्या शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद, केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंदकोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. (Covid-19) त्यामुळे विविध राज्यांसह केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (fearing a Covid-19 second wave) त्यातही महाराष्ट्रासह, केरळ, गुजरात आणि अन्य काही राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Corona patients are rise in Maharashtra, Kerala & Gujarat)समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तर गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे २५८ नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या चार हजार ६५० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या १० लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९ लाख ६७ हजार ६३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५८ हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गुजरातमध्येही कोरोनाच्या २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून २ लाख ६६ हजार ८२१ झाली आहे. गुजरातमध्ये शनिवारी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ४०४ वर स्थिर आहे. तर राज्यात सध्या १ हजार १६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातKeralaकेरळHealthआरोग्य