शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:22 IST

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे.

बोकारो - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात थैमान घातले आहे. अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. (Coronavirus in India) झारखंडमधील बोकारो या शहरामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे महिनाभरात मृतांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत हे शहर राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे. (death toll doubles in a month in Bokaro)

बोकारो शहरातील रहिवासी त्यांना कोरोना झालाय की टायफॉइड यावरून गोंधळून जात आहे. त्यामुळे योग्य उपचारांना उशीर होत असून, उशिरा सुरू होणाऱ्या किंवा चुकीच्या उपचारांमुळे येथील मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. 

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बोकारोमधीली सदर रुग्णालयामध्ये सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळच्याच गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय धर्मनाथ यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्यावर टायफॉइड समजून उपचार केले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. 

मात्र प्रत्येक रुग्णाचे नशीब चांगले असेलच असे नाही. ४० किमी दूर पटेरवार ब्लॉक येथील राहणाऱ्या रामस्वरूप अग्रवाल यांना गेल्या महिन्यात टायफॉइड झाला होता. त्यांना जवळच्याच रामगडमधील एखा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथील सरपंच अनिल सिंह यांनी सांगितले की, टायफॉइडबाबत गावातील लोकांचा खूप गोंधळ उडत आहे. सुरुवातीच्या तपासणीमध्ये अग्रवाल यांना कोरोना असल्याचे दिसून आले. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, येथील एका सरकारी रुग्णालयातील मेडिकल सुपरिटेंडेंट अलबेला केरकेट्टा यांनी सांगितले की, लोक कोरोनावर उपचार घेण्यास घाबरत आहेत. कुणाचा टायफॉइडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत. मात्र नंतर अशा रुग्णांची प्रकृती बिघडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जागरुकता वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंडIndiaभारत