शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:22 IST

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे.

बोकारो - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात थैमान घातले आहे. अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. (Coronavirus in India) झारखंडमधील बोकारो या शहरामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे महिनाभरात मृतांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत हे शहर राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे. (death toll doubles in a month in Bokaro)

बोकारो शहरातील रहिवासी त्यांना कोरोना झालाय की टायफॉइड यावरून गोंधळून जात आहे. त्यामुळे योग्य उपचारांना उशीर होत असून, उशिरा सुरू होणाऱ्या किंवा चुकीच्या उपचारांमुळे येथील मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. 

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बोकारोमधीली सदर रुग्णालयामध्ये सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळच्याच गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय धर्मनाथ यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्यावर टायफॉइड समजून उपचार केले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. 

मात्र प्रत्येक रुग्णाचे नशीब चांगले असेलच असे नाही. ४० किमी दूर पटेरवार ब्लॉक येथील राहणाऱ्या रामस्वरूप अग्रवाल यांना गेल्या महिन्यात टायफॉइड झाला होता. त्यांना जवळच्याच रामगडमधील एखा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथील सरपंच अनिल सिंह यांनी सांगितले की, टायफॉइडबाबत गावातील लोकांचा खूप गोंधळ उडत आहे. सुरुवातीच्या तपासणीमध्ये अग्रवाल यांना कोरोना असल्याचे दिसून आले. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, येथील एका सरकारी रुग्णालयातील मेडिकल सुपरिटेंडेंट अलबेला केरकेट्टा यांनी सांगितले की, लोक कोरोनावर उपचार घेण्यास घाबरत आहेत. कुणाचा टायफॉइडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत. मात्र नंतर अशा रुग्णांची प्रकृती बिघडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जागरुकता वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंडIndiaभारत