शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:22 IST

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे.

बोकारो - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात थैमान घातले आहे. अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. (Coronavirus in India) झारखंडमधील बोकारो या शहरामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे महिनाभरात मृतांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत हे शहर राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे. (death toll doubles in a month in Bokaro)

बोकारो शहरातील रहिवासी त्यांना कोरोना झालाय की टायफॉइड यावरून गोंधळून जात आहे. त्यामुळे योग्य उपचारांना उशीर होत असून, उशिरा सुरू होणाऱ्या किंवा चुकीच्या उपचारांमुळे येथील मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. 

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बोकारोमधीली सदर रुग्णालयामध्ये सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळच्याच गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय धर्मनाथ यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्यावर टायफॉइड समजून उपचार केले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. 

मात्र प्रत्येक रुग्णाचे नशीब चांगले असेलच असे नाही. ४० किमी दूर पटेरवार ब्लॉक येथील राहणाऱ्या रामस्वरूप अग्रवाल यांना गेल्या महिन्यात टायफॉइड झाला होता. त्यांना जवळच्याच रामगडमधील एखा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथील सरपंच अनिल सिंह यांनी सांगितले की, टायफॉइडबाबत गावातील लोकांचा खूप गोंधळ उडत आहे. सुरुवातीच्या तपासणीमध्ये अग्रवाल यांना कोरोना असल्याचे दिसून आले. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, येथील एका सरकारी रुग्णालयातील मेडिकल सुपरिटेंडेंट अलबेला केरकेट्टा यांनी सांगितले की, लोक कोरोनावर उपचार घेण्यास घाबरत आहेत. कुणाचा टायफॉइडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत. मात्र नंतर अशा रुग्णांची प्रकृती बिघडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जागरुकता वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंडIndiaभारत