शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:22 IST

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे.

बोकारो - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात थैमान घातले आहे. अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. (Coronavirus in India) झारखंडमधील बोकारो या शहरामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे महिनाभरात मृतांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत हे शहर राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे. (death toll doubles in a month in Bokaro)

बोकारो शहरातील रहिवासी त्यांना कोरोना झालाय की टायफॉइड यावरून गोंधळून जात आहे. त्यामुळे योग्य उपचारांना उशीर होत असून, उशिरा सुरू होणाऱ्या किंवा चुकीच्या उपचारांमुळे येथील मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. 

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बोकारोमधीली सदर रुग्णालयामध्ये सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळच्याच गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय धर्मनाथ यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्यावर टायफॉइड समजून उपचार केले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. 

मात्र प्रत्येक रुग्णाचे नशीब चांगले असेलच असे नाही. ४० किमी दूर पटेरवार ब्लॉक येथील राहणाऱ्या रामस्वरूप अग्रवाल यांना गेल्या महिन्यात टायफॉइड झाला होता. त्यांना जवळच्याच रामगडमधील एखा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथील सरपंच अनिल सिंह यांनी सांगितले की, टायफॉइडबाबत गावातील लोकांचा खूप गोंधळ उडत आहे. सुरुवातीच्या तपासणीमध्ये अग्रवाल यांना कोरोना असल्याचे दिसून आले. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, येथील एका सरकारी रुग्णालयातील मेडिकल सुपरिटेंडेंट अलबेला केरकेट्टा यांनी सांगितले की, लोक कोरोनावर उपचार घेण्यास घाबरत आहेत. कुणाचा टायफॉइडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत. मात्र नंतर अशा रुग्णांची प्रकृती बिघडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जागरुकता वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंडIndiaभारत